Sangli News: ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन आमदार, खासदारांच्या मागणीनुसार सांगलीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चार महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र त्यावर कार्यवाही न करता प्रशासनाने तलावाचे व्यवस्थापन साताऱ्याकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली गतीने सुरू केल्या आहेत. चक्क जलसंपदा मंत्र्यांच्याच आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवून दुष्काळी भागावर अन्याय केल्याची संतापजनक प्रतिक्रिया उमटली आहे..राजेवाडी येथे ब्रिटिशांनी तीन टीएमसी क्षमतेचा तलाव बांधला आहे. तलावाचा भराव आणि काही पाणीसाठा आटपाडी तालुक्यात आणि उर्वरित पाणीसाठा सातारा जिल्ह्यात होतो. पाण्याचा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला लाभ होतो. तलावाचे शाखा कार्यालय महूद (ता. सांगोला) येथे आहे. .Agricultural Exports: द्राक्ष-मनुका-डाळिंब निर्यातीचे ‘सांगली पॅटर्न’ मॉडेल बनविणार.तलाव एकीकडे आणि व्यवस्थापन वितरण विभाग दुसरीकडे असल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे सोय आणि व्यवहाराच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आमदार सुहास बाबर, डॉ. बाबासाहेब देशमुख, सदाभाऊ खोत, माजी आमदार शहाजी पाटील, दीपक साळुंखे यांच्यासह १४ आमदार, सहा खासदारांनी राजेवाडीचे व्यवस्थापन सांगलीकडे वर्ग करण्याची मागणी केली. त्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चार महिन्यांपूर्वी सांगली येथे ‘पाटबंधारे’च्या बैठकीत राजेवाडी तलाव सांगलीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले..Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीतील १.९८ कोटी शासनाकडून वसूल .त्यावर प्रशासनाने कार्यवाही करण्याऐवजी जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवली आहे. वरिष्ठ पाटबंधारे विभागाने सातारा जिल्ह्याकडे तलावाचे व्यवस्थापन हस्तांतरित करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. त्याचे तीव्र आटपाडी, सांगोला तालुक्यांत पडसाद उमटलेत. राजेवाडी तलाव व्यवस्थापनाशी सातारा विभागाचा कसलाही संबंध नसताना दुष्काळग्रस्तांची अडवणूक आणि त्रास देण्यासाठीच व्यवस्थापन साताऱ्याकडे नेण्याचा घाट घातल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. तलावाचे व्यवस्थापन सांगलीकडे हस्तांतरित करून उपविभागीय कार्यालय आटपाडी आणि वितरण शाखा कार्यालय राजेवाडीत करावे, अशी मागणी आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी जोरदार आवाज उठवला आहे. पाठिंबा दिलेल्या सर्व आमदारांशी संपर्क साधून दुष्काळी भागावर केल्या जाणाऱ्या अन्यायाची माहिती दिली..सोय आणि व्यवहाराच्या दृष्टीने राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगलीकडे असणे योग्य आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्र्यांनी आदेश दिलेले असताना प्रशासनाने मनमानी करून तलाव व्यवस्थापनाचे हस्तांतर सातारा जिल्ह्याकडे करण्याचा घाट घातला आहे. दुष्काळी भागावर अन्याय करणाऱ्या या प्रकाराचा तीव्र निषेध आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीकडेच तलावाचे हस्तांतर झाले पाहिजे. सादीक खाटीक, सामाजिक कार्यकर्ते, आटपाडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.