Jalgaon News : खानदेशात दीपोत्सवात पावसाने हजेरी लावली. यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. कापूस वेचणी, मशागत, मळणीची कामे अनेक भागात बंद तर काही भागात रखडत सुरू आहे. .ढगाळ वातावरणाने पीकवाढीसही यामुळे फटका बसू शकतो, असाही अंदाज आहे. दीपोत्सवापूर्वी देखील अंशतः ढगाळ वातावरण होते. परंतु हे पाडवा सणालाच पाऊस आला. जळगावात जोरदार पाऊस झाला. काही भागात मध्यम ते हलका पाऊस झाला..Weekly Weather: राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता.थंडीची चाहूल, लागलीच ढगाळजळगावात दीपोत्सवाच्या काही दिवसांपूर्वी नीरभ्र वातावरण होते. किमान तापमान खानदेशात १६ अंश सेल्सिअसपर्यंत आले होते. परंतु दीपोत्सवाच्या चार ते पाच दिवसांपूर्वी अंशतः ढगाळ वातावरण पुन्हा तयार झाले आणि पाऊसही आला. यामुळे केळी, भाजीपाला पिकांत बुरशीजन्य रोगांची समस्या पसरण्याची भीती आहे. तसेच हरभरा, दादर ज्वारी आदी पिकांच्या पेरणीसही काही भागात अडचण आहे..कोरड्या वातावरणाची गरजसध्या निरभ्र, कोरड्या वातावरणाची गरज रब्बी पिकांना आहे. परंतु पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसानीचा धसका घेतल्याची स्थिती आहे. कारण सध्या कांदेबाग केळी, पपई पिकात काढणी सुरू आहे. केळी लागवडदेखील खानदेशात सुरू आहे. काढणी, खरेदीची कार्यवाही शिवारात होत असल्याने त्यासाठी कोरड्या व निरभ्र वातावरणाची गरज आहे. ढगाळ वातावरणामुळे खरेदीदार खरेदी, काढणीची प्रक्रिया लांबणीवर टाकतात. यामुळे शेतकऱ्यांना काढणीची प्रतीक्षा करावी लागते..पेरणीत अडथळेकोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीची पेरणी खानदेशात बऱ्यापैकी झाली आहे. त्यात काही शेतकऱ्यांनी सिंचनाचे नियोजन केले होते. परंतु अशातच पाऊस आल्यास मोठी हानी होईल, अशी भीती असल्याने सिंचनाचे नियोजन शेतकऱ्यांनी लांबणीवर टाकले आहे. यात काही भागात पेरणी अपूर्ण असून, पेरणीत अडथळे येत आहेत. .Maharashtra Weather: ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला.मागील दोन दिवसांपासून दुपारी उकाडा, उष्णता व रात्री १० च्या नंतर काहीसे थंड वातावरण तयार होत आहे. पहाटेची थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, हे तापमान २० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. हुडहुडी भरविणारी थंडी पडण्यापूर्वीच तापमानात काहीशी वाढ झाली आहे. विविध हवामान अभ्यासकांनी पुन्हा पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांत भीती आहे..खराब रस्त्यांलगतच्या शेतकऱ्यांचा काढणीवर भरखराब रस्ते, अडचणीच्या भागातील रस्त्यांलगतच्या शेतकऱ्यांनी मात्र केळी, पपई काढणीवर भर दिला आहे. कारण या भागात हलका पाऊसदेखील झाल्यास वाहने शेतापर्यंत पोचत नाहीत. यामुळे काही शेतकऱ्यांना कमी पक्व शेतमालही काढणी करून खरेदीदारांना द्यावा लागत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.