Jal Jeevan Mission Delay: रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊंचे समाधी स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचाड गावाला सध्या तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या ४० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याने, याचा फटका ग्रामस्थ आणि पर्यटकांना बसत आहे. या भागात आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे..मागील अनेक वर्षांपासून पाचाड गाव टंचाईग्रस्त असून, या ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजना, तलाव अशा योजना राबवूनही येथील पाणीप्रश्न सुटलेला नाही. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई निर्माण होते. सध्या पाचाड गाव, पाचाडनाका, मोहल्ला, बौद्धवाडी, सर्व इतर वाड्यांना चौखंडी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, पाचाड गाव येथील हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटकांना हे पाणी पुरत नाही. .Irrigation Water Crisis: बंधारे तळाला; गोदापात्रात पाणी सोडा.यावर उपाय म्हणून मागील वर्षी पाचाड व इतर वाड्यांसाठी ४० कोटींची नळ पाणीपुरवठा योजना जलजीवनमधून मंजूर करण्यात आली होती, परंतु दीड वर्षापासून या योजनेचे काम ठप्प आहे. परिणामी, सद्यःस्थितीत आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे व्यावसायिकांना पाणी विकत आणावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक आणि शिवप्रेमी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे..Rural Water Crisis: ग्रामीण भागातील पाणी शुद्ध आहे का?.या योजनेच्या कामाची सर्व वस्तुस्थिती मंगेश वाकडीकर यांनी जाणून घेतली. योजनेचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे रखडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कडक इशारा दिला आहे. महिनाभरानंतर पुन्हा या कामाची पाहणी करण्यासाठी येऊ त्या वेळी जर काम पूर्ण झालेले दिसले नाही, तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला..जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर हे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमासाठी रायगडला आले असता हॉटेलचे मालक आणि सामाजिक कार्यकर्ते अनंत देशमुख यांनी पाचाड गावाला भेडसावणारा पाणीप्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला. वाकडीकर यांनी पाचाडच्या सरपंच सीमा बेंदुगडे आणि अनंत देशमुख यांच्यासह योजनेशी संबंधित ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जगदीश फुलपगारे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेंद्र देशमुख आणि अधिकारी वर्गाला बोलावून घेत पाचाड जलजीवन मिशन योजना कामाचा आढावा घेतला..रायगड किल्ला व पाचाड येथे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांसाठी पाण्याची गरज लागत आहे. ग्रामपंचायतकडून आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आम्हा व्यावसायिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.- अनंत देशमुख, हॉटेल व्यावसायिक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.