Heavy Rain: रायगड जिल्ह्यात यंदाच्या पावसाने अक्षरशः जलक्रांती घडवून आणली आहे. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ धरणांपैकी तब्बल २१ धरणे तुडुंब भरली आहेत. जिल्ह्यातील एकूण उपयुक्त जलसाठा ९०.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. .दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या अनेक गावांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची घडामोड ठरली आहे. यंदा पाणीटंचाईची झळ जुलै महिना सुरू होईपर्यंत जाणवत होती. साधारण एक लाख ६० हजार नागरिक या टंचाईत होरपळून निघाले होते..Heavy Rain: धरण क्षेत्रात पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ.सध्या पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील २१ लघुपाटबंधारे भरली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. रायगडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावत धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची भर घातली. परिणामी, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत..Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा.विशेष म्हणजे, अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येत होती, मात्र यंदा धरणांतील मुबलक जलसाठ्यामुळे अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी झाली आहे..२८ पैकी २१ धरणे तुडुंबलघुपाटबंधारे विभागाच्या २८ धरणांपैकी फणसाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, कुडकी, पाभरे, संदेरी, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले, कलोते-मोकाशी, डोणवत, मोरबे आणि बामणोली ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. उर्वरित सात धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.