Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावणे पाच लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी कृषी विभागाने नियोजन करून बियाणे मागणी केली आहे. साधारण एक लाख ६०३ क्विंटल बियाणांची गरज असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले..अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ५७ हजार १२५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा साधारण पाच लाख हेक्टरवर रब्बीत पेरणीचा अंदाज आहे. गेल्यावर्षी ४ लाख ४७ हजार ३७२ हेक्टरवर पेरणी झाली होती. तीन वर्षातील पेरणी आणि बियाणे विक्रीनुसार यंदा बियाणांची मागणी केली आहे. .Rabi Season : सातारा जिल्ह्याला रब्बीसाठी एक लाख टन खत मंजूर .गेल्यावर्षी (२०२४) ४० हजार ८६५ क्विंटल, २०२३ ला ४६ हजार ०२८ तर २०२३ ला ४१ हजार ८५ क्विटंल बियाणांची विक्री झाली होती. यंदा गहु आणि मकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असल्याने बियाणांची अधिक गरज असल्याचे दिसत आहे. .Rabi Season: राज्यात रब्बीचे क्षेत्र दहा लाख हेक्टरने वाढणार: दत्तात्रय भरणे.कृषी विभागाने यंदा ज्वारीचे १ लाख ६४ हजार ०४२ हेक्टर, गव्हाचे १ लाख ६५ हजार हेक्टर, हरभऱ्याचे १ लाख १८ हजार हेक्टर, सूर्यफुलाचे ११७ हेक्टर करडईचे हेक्टर आणि मकाचे ४३ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत केले आहे. .यंदा सार्वजनिक बियाणे कंपन्यांकडून ४३७१२ क्विटंल तर खासगी कंपन्यांकडून ५६ हजार ८९० क्विटंल बियाणे मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे.बियाणे मागणी (क्विंटल)ज्वारी ः ४१०१गहु ः ६११९६हरभरा ः २६५५८सूर्यफूल ः ५करडई ः १९मका ः ८७२७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.