Hingoli News: कृषी आणि महसूल विभागाकडून हिंगोली जिल्ह्यांतील २०२५-२६ मधील रब्बी पीकांचे पेरणी क्षेत्र २० जानेवारीला अंतिम करण्यात आले.त्यानुसार जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ६९ हजार २२० असतांना यंदा प्रत्यक्षात २ लाख १५ हजार २५१ हेक्टरवर (१२७.२० टक्के) पेरणी झाली आहे. परंतु गतवर्षी (२०२४-२५) च्या तुलनेत यंदा एकूण रब्बीच्या पेरणीत १० हजार २०६ हेक्टरने घट झाली आहे. गहू, करडई, तिळाच्या पेरणीत वाढ तर ज्वारी, हरभरा, सूर्यफुलाच्या पेरणीत घट झाली आहे. .यंदा ज्वारीचे सरासरी क्षेत्र ९ हजार ५६७ हेक्टर असतांना प्रत्यक्षात १६ हजार ३५१ हेक्टरवर (१७०.९०टक्के) पेरणी झाली. गव्हाचे सरासरी क्षेत्र ३३ हजार ४६९ हेक्टर असतांना यंदा प्रत्यक्षात ४१ हजार ६९७ हेक्टर (१२४.५८ टक्के) पेरणी झाली. मक्याची ६२४ पैकी २७५ हेक्टर (४४.०५ टक्के) पेरणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारीच्या पेरणीत १ हजार १२८ हेक्टरने घट तर गव्हाच्या पेरणीत ९७९ हेक्टरने वाढ झाली आहे. .तृणधान्यांचे सरासरी क्षेत्र ४४ हजार ५२९ हेक्टर असतांना प्रत्यक्षात ५९ हजार ३८१ हेक्टर (१३३.३५ टक्के), पेरणी झाली. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख २१ हजार ६२ हेक्टर असतांना यंदा प्रत्यक्षात १ लाख ५२ हजार ५२१ हेक्टर (१२५.९९ टक्के) पेरणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत हरभऱ्याच्या पेरणीत ७ हजार २४८ हेक्टरने घट झाली. .Rabi Sowing: नाशिक जिल्ह्यात रब्बी पेरा ११४ टक्के .कडधान्यांचे सरासरी क्षेत्र १ लाख २१ हजार ३३७ हेक्टर असतांना १ लाख ५२ हजार ८६६ हेक्टर (१२५.८८ टक्के) पेरणी झाली. एकूण अन्नधान्यांचे सरासरी क्षेत्र १ लाख ६५ हजार ८६६ हेक्टर असतांना २ लाख १२ हजार १२२ हेक्टर (१२७.८९ टक्के) पेरणी झाली. करडईची २ हजार ५२ पैकी २ हजार ४४ हेक्टर (९९.५७ टक्के) पेरणी झाली..Rabi Sowing: अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बी पेरणी ९६ टक्के.जवसाची ४३२ हेक्टर, तिळाचे सरासरी क्षेत्र ५६ हेक्टर असतांना प्रत्यक्षात १५६ हेक्टर, सूर्यफुलाचे २५० पैकी ५१ हेक्टर (२०.४० टक्के) पेरणी झाली. गतवर्षीपेक्षा यंदा करडईच्या पेरणीत १ हजार २४७ हेक्टरने वाढ, तिळाच्या पेरणीत ४७ हेक्टरने वाढ तर सूर्यफुलाच्या पेरणीत ७५३ हेक्टरने घट झाली आहे. एकूण गळीत धान्यांची ३ हजार ३५४ पैकी ३ हजार १२९ हेक्टर (९३.२८ टक्के) पेरणी झाली. यंदाही कळमनुरी वगळता उर्वरित पाच तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..यंदा जिल्ह्यातील हळदीच्या लागवडीत वाढ झाली. खरिपात सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. त्यामुळे एकंदरीत रब्बीच्या पेरणीत गतवर्षीपेक्षा घट दिसत आहे. करडईच्या पेरणीतील वाढ समाधानकारक आहे.- राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.