Nashik News: अतिवृष्टीमुळे शिवारांमध्ये सर्वत्र पाणी होते. परिणामी रब्बी हंगामाच्या पेरण्या अडचणीत सापडल्या होत्या. मात्र आता वाफसा झाल्यानंतर पेरण्यांना वेग येत आहे. जिल्ह्यात सोमवारअखेर (ता. १) २९ टक्के पेरणी झाली आहे. वाफसा उशिरा झाल्याने रब्बीचा पेरा सरासरीच्या निम्म्याहून कमी झाल्याचे चित्र आहे..कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात रब्बी पेरणीचे सरासरी क्षेत्र १ लाख १४ हजार १५ हेक्टर आहे. मात्र जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर ३३ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अन्नधान्य पिकात गहू, ज्वारी व मका व हरभरा पेरणी होत आहे. मात्र गळीतधान्य पिकांचे क्षेत्र घटलेले असताना अद्याप पेरा शून्यावर आहे..Rabi Sowing: अकोल्यातील रब्बी लागवड ६० टक्क्यांवर.अन्नधान्य पिकांमध्ये पेरा सर्वाधिक असून त्यामध्ये तृणधान्य पिकात गहू पेरणी १६ हजार ५६१ हेक्टरवर झाली आहे. मात्र एकूण सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी अवघी २५ टक्के आहे. सिन्नर तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर प्रमुख गहू उत्पादक असलेल्या निफाड तालुक्यात पेरणीला हळूहळू गती येत आहे. येथे १ हजार ६९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मालेगाव, बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव, सुरगाणा, नाशिक, त्रंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड या तालुक्यांत पेरणी झाली आहे..Rabi Sowing: चाकूर तालुक्यात ९० टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी पूर्ण.ज्वारीचे क्षेत्र नाशिक जिल्ह्यात नगण्य असते. येथे ९५६ हेक्टरवर पेरा झाला असून ही टक्केवारी २२ टक्के आहे. सिन्नर, मालेगाव, कळवण, नांदगाव, सुरगाणा, दिंडोरी व येवला तालुक्यांत कमीअधिक प्रमाणावर पेरणी झाली आहे.मक्याची लागवड देखील वाढत असून पेरणीची टक्केवारी सर्वाधिक आहे. मालेगाव, बागलाण, नांदगाव, निफाड, सिन्नर व येवला या तालुक्यांत पेरणी होत आहे. तर नाशिक, बागलाण, चांदवड या तालुक्यांतही क्षेत्र सध्या तरी तुलनेत कमी आहे..कडधान्य पिकामध्ये हरभरा पेरणी क्षेत्र ३० हजार ३५७ हेक्टर आहे; मात्र येथेही ९ हजार २१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती अवघी २७ टक्के आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण कमी आहे. गळीतधान्य पिकांमध्ये करडई, जवस, तीळ व सूर्यफूल या पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत असल्यास स्थिती आहे. या पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ४७ हेक्टर आहे. मात्र या पिकांची अद्याप पेरणी झालेली नसल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून समोर आले आहे..नांगरणी करूनशिवाराची तयारीपेरणीच्या ऐन तोंडावर अतिवृष्टीने दणका दिल्याने वेळेवर वाफसा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या जवळपास महिनाभर लांबणीवर गेल्या आहेत. शेतकरी नांगरणी करून शिवार तयार करत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे, अशी माहिती वागदर्डी (ता. चांदवड) येथील शेतकरी अमोल गागरे यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.