Pune News: नोव्हेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि जमिनीत ओलावा असल्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडली आहे. यामुळे पिकांचे नियोजन कोलमडले असून, शेतकरी चिंतेत आहेत..सततच्या पावसामुळे शेतात सगळीकडे चिखल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेतात वाफसा येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. साहजिकच वाफसा न आल्याने पेरणीची कामे रखडली आहेत..Rabi Sowing : पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्यांची लगबग सुरू.दौंड तालुक्याच्या पूर्व भागात खरीप हंगामातील मका, तूर, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस इत्यादी पिके घेतल्यानंतर लगेच रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो. या हंगामातील महत्त्वाची असणारी गहू, हरभरा, भुईमूग, मका इत्यादी पिके घेतली जातात. परतीचा पाऊस लांबल्याने व शेतात वाफसा नसल्याने सध्या रब्बी हंगाम लांबणीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे..यंदा परतीचा पाऊस लांबल्याने व मुसळधार पाऊस अखेरपर्यंत कोसळल्याने निचरा क्षेत्रातही ओलावा अधिक आहे. यामुळे रब्बी हंगाम रखडला असून याचा परिणाम पिकांवर होणार आहे. पावसामुळे शेती संकटात सापडली असून, किमान रब्बी हंगामातील पिके बहरून यावीत, अशी आशा आहे.अरविंद मोरे, शेतकरी, राजेगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.