Punjab Flood: पंजाबमधील पूर संकट; केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांनी आढावा घेतला
Shivraj Singh Chouhan: पंजाबमधील गेल्या चार दशकांतील सर्वात भीषण पूर संकटाने ३७ जणांचा बळी घेतला असून, ३ लाख ५५ हजार लोक बाधित झाले आहेत. सतलज, बियास आणि रावी नद्यांना आलेल्या पुरामुळे १ लाख ७५ हजार हेक्टरवरील भातपिके उद्ध्वस्त झाली आहेत.