Pune Dam Water Storage Update: पुणे : फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा पारा वाढू लागल्याने जिल्ह्यातील पाण्याची मागणी वाढू लागली आहे. गेल्या तीन महिन्यांत सुमारे ६३ टीएमसी पाण्याचा वापर झाला असून सध्या १३९.४२ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता तुलनेने कमी राहण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे..पावसाळ्यात जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या मुबलक पावसामुळे २६ धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. या धरणांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता १९८.३४ टीएमसी असून, पावसाळ्यानंतर तब्बल २०२.६७ टीएमसी (१०२ टक्के) इतका साठा नोंदवला गेला होता. मात्र, मागील तीन महिन्यांत झालेल्या वापरामुळे सध्या धरणांमध्ये सुमारे ७० टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा १२१.८१ टीएमसी (६१ टक्के) इतका होता. त्यामुळे यंदा तुलनेने अधिक पाणीसाठा असल्याचे दिसून येते..रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरूरब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, मका, सूर्यफूल तसेच कांदा, बटाटा, भाजीपाला व फळबागा ही पिके सध्या वाढीच्या आणि काढणीच्या अवस्थेत आहेत. या पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध राहावे, यासाठी गेल्या एक-दोन महिन्यांपासून धरणांतून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ आंबेगाव, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे..Nanded Dam Water Storage: नांदेडमध्ये प्रकल्पांतील पाण्यात झपाट्याने घट.शहरांचा वाढता पाणीपुरवठाजिल्ह्यातील बहुतांश धरणे पश्चिम भागात असून उजनी धरण वगळता इतर सर्व धरणे पश्चिमेकडे आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांना प्रामुख्याने खडकवासला धरण, चासकमान धरण आणि पवना धरण येथून पाणीपुरवठा केला जातो. तसेच पूर्वेकडील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांसाठी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे..Dam Water Storage: ‘कसमादे’तील धरणांमध्ये ८० टक्के जलसाठा.पाच धरणांतून कालव्यांत विसर्गसध्या खडकवासला धरण, चासकमान धरण, वीर धरण, डिंभे धरण आणि उजनी धरण या पाच धरणांतून डाव्या व उजव्या कालव्यांसह बंद जलवाहिनीद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी हळूहळू घटत आहे. सध्या पाणीसाठा समाधानकारक असला तरी मार्चपासून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी पाण्याची मागणी वाढून धरणांतील साठा झपाट्याने कमी होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे..धरणनिहाय असलेला पाणीसाठा (टीएमसीमध्ये)टेमघर १.४५, वससगाव ८.७७, पानशेत ७.७१, खडकवासला १.१८, पवना ५.१७, कासारसाई ०.३७, कळमोडी १.४६, चासकमान ४.६२, भामा आसखेड ६.४२, आंद्रा २.०३, वडिवळे ०.८०, शेटफळ ०.५२, नाझरे ०.३८, गुंजवणी २.८४, भाटघर १७.४८, निरा देवघर ९.०३, वीर ५.०२, पिंपळगाव जोगे २.४१, माणिकडोह ५.०२, येडगाव १.५६, वडज ०.९१, डिंभे ८.४०, चिल्हेवाडी ०.६८, घोड ३.३६, विसापूर ०.५८, उजनी ४१.२५, मुळशी १२.३२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.