Farmer Loss: पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विविध पिकांमध्ये गहू, कांदा, द्राक्ष आंबा यासह भाजीपाला पिकाचा समावेश आहे. शासनाने तातडीने पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. .दरम्यान, चांडोली (ता. आंबेगाव) येथे उसाला पाणी देत असताना, विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने त्याच्या धक्क्याने सुरेश पांडुरंग थोरात (वय ४४) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.सोमवारी (ता. ३०) सायंकाळी पुणे शहरासह जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर दौंड, बारामतीमध्ये कमी अधिक प्रकारचा पाऊस झाला..गारपिटीसह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उभी पिके उन्मळून पडली. यामध्ये गहू, कांदा, द्राक्ष आंबा यासह भाजीपाला पिकाचा समावेश आहे. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात आंबा फळधारणेच्या अवस्थेत आहे. वादळी वारा आणि गारांच्या माऱ्याने कैऱ्या पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले..Unseasonal Rain Damage: नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट.भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात सोमवारी (ता. ३०) दुपारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारांमुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाळत घातलेल्या कच्च्या विटा विरघळल्याने आणि माती वाहून गेल्याने उत्पादक संकटात सापडले आहेत..‘‘शेतकऱ्यांप्रमाणेच आमच्या नुकसानीचेही पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी,’’ अशी मागणी अशोक कुंभार, मनीषा कुंभार, हनुमंत शिवतरे यांच्यासह स्थानिक उत्पादकांनी केली आहे..जुन्नर तालुक्यात नारायणगाव, ओतूर, वडज परिसरातील गावांत सोमवारी सकाळपासून काही भागांत ढगाळ हवामान व प्रचंड उकाडा होता. वाढत्या उष्म्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र दुपारी साडेतीननंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि काही भागात अवकाळी गारपीट झाली. यावेळी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. .Pune Unseasonal Rain: पुणे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस.कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा आणि गहू भिजू नये, म्हणून प्लॅस्टिक टाकण्यासाठी धावपळ करावी लागली. परिसरात उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा, खिरेश्वर, सांगनोरे, सितेवाडी, बगाडवाडी, पारगाव व मढ, माळवाडी, नेतवड, बल्लाळवाडी, खामुंडी, डुंबरवाडी व इतर परिसरात पाऊस झाला..वाडा (ता. खेड) व परिसरात अवकाळी पाऊस व जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वाडा, गुंडाळवाडीसह बुरसेवाडी येथील शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली. वाडा व परिसरातील ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. पावसाबरोबरच झालेल्या गारपिटीमुळे संपूर्ण परिसर पांढराशुभ्र झाला होता. मात्र निसर्गाच्या या खेळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे..परिसरात सुमारे एक तास चाललेल्या तुफान पावसाबरोबर झालेल्या गारपिटीमुळे भाजीपाला पिके, आंबा, पेरू, चिकूच्या फळबागा आणि रब्बी हंगामातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारांच्या मारामुळे झाडांची पाने गळून पडली, तर आंबा फळाचेही मोठे नुकसान झाले आहे..केवळ पिकेच नव्हे, तर शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेला सुका चारा आणि पेंढा या पावसाने भिजला आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेत वाडा परिसरात गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पाहणी करून व पंचनामे करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.