Pune News: पुणे जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा १० तालुक्यांमधील ४९२ गावांतील साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला होता. शेतकऱ्यांना याची नुकसानभरपाई देण्यासाठी १० कोटी ५७ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे..जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाने एकत्रितरित्या केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामध्ये दहा तालुक्यांमधील ३१० गावांमध्ये जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे..Heavy Rainfall: सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील संकट अधिकच गडद.याचा फटका ९ हजार ५२७ शेतकऱ्यांना बसला असून ३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी २ कोटी १९ लाख ९१ हजार ९२० रुपये भरपाईची मागणी केली आहे. १११ गावांमधील सात हजार ८७५ शेतकऱ्यांच्या बागायती पिकांचे नुकसान झाले असून हे क्षेत्र २ हजार ८१६ हेक्टर इतके आहे..Nanded Heavy Rainfall: नांदेडला पुन्हा जोरदार पाऊस.या नुकसानीपोटी ४ कोटी ७८ लाख ८८ हजार ३२० रुपयांची मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे ७१ गावांमधील १ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या फळपिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी २ कोटी ९८ लाख ४३ हजार ३२५ रुपयांची मागणी करण्यात आली आहे..नुकसानभरपाईचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत वितरित करण्यात येईल. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.- संजय काचोळे, कृषी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.