Pune District Sowing: ‘‘सोयाबीनची पेरणी आम्ही ठिबकवर केली खरी; पण पिकाला पावसाच्या पाण्याची सर ठिबकला येत नाही. पाऊस पडला की पीक एकदम जोम धरतं. जूनभर आभाळाकडे डोळे लावून बसलो होतो. आता गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिवात जीव आला आहे. उरलेली कामेही वेगाने करता येतील, अशी आशा वाटते,’’ अशा शब्दांत कांबळेश्वर (ता. बारामती) येथील शेतकरी जयश्री खलाटे यांनी खरीप हंगामातील दिलासादायक परिस्थिती व्यक्त केली..खरिपाच्या धोक्यात आलेल्या पेरणीला जुलै महिन्यात झालेल्या पावसाने संजीवनी दिली. मागील आठ दिवसांत १० टक्के पेरणीचे क्षेत्र वाढून ते आता १२ टक्क्यांवर गेले आहे. मात्र, हे प्रमाण गत वर्षीच्या तुलनेत ४७ टक्क्यांनी कमी आहे. सध्या दौंड, आंबेगाव आणि बारामती तालुक्यांत पेरण्यांना वेग आला असून, इतर जिल्ह्यांतही वाफसा झाल्यानंतर पेरण्यांना वेग येणार आहे. .Kharif Sowing Delay: अकोला जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या रखडल्या.सोयाबीन आणि मका पिकांच्या पेरण्या अधिक होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला. तर जून महिन्यात पाऊस न झाल्याने मूग आणि उडदाच्या पेरणीचे क्षेत्र घटू शकते. त्याऐवजी शेतकरी बाजरी, सोयाबीन यांसारख्या पर्यायी पिकांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे. दरम्यान, भोर, राजगड, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात पाच हजार ८६१ हेक्टरवर भात रोपवाटिका करण्यात आल्या असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले..पंचनाम्यांची प्रक्रिया सुरूअतिवृष्टीमुळे काही भागांत शेतजमिनींचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी पिकांच्या नुकसानीचे प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत. ज्या ठिकाणी जमीन किंवा पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे तातडीने संयुक्त पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचे अचूक स्वरूप आणि अधिकृत आकडेवारी स्पष्ट होईल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..Kharif Sowing Delay: पावसाअभावी पावणेदोन लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या.जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणखी तीन ते चार दिवसांत वाफसा झाल्यानंतर जिल्ह्यात पेरण्यांना वेग येईल. मूग-उडदाचे क्षेत्र काहीसे कमी होईल; मात्र इतर खरीप पिकांची पेरणी सरासरी एवढी होईल.संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.जूनमध्ये पाऊस नसल्याने पेरणी करायची की थांबायचे, हा मोठा प्रश्न होता. आता पाऊस झाल्याने शेतात कामांना वेग आला आहे. पिकांची उगवणही चांगली होईल, अशी अपेक्षा आहे. पुढेही पावसाने साथ दिली तर खरीप हंगाम चांगला जाईल बाळासाहेब शिंदे, शेतकरी, करंजावणे, ता. शिरूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.