Ahilyanagar News: मुंबई-नाशिक-पुणे या सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येते. संगमनेरमार्गे रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. .तरीही राजकीय स्वार्थासाठी नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग बदलला असून या बदलापाठीमागे कोणतेही तांत्रिक कारण देण्यात आलेले नाही, अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट करत संगमनेरमार्गे रेल्वेसाठी आंदोलन उभारण्याचा निर्णय संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला..Beed Ahilyanagar Railway: ४० वर्षांची प्रतीक्षा संपली; बीड–अहिल्यानगर रेल्वे अखेर सुरू; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन.नाशिक-पुणे रेल्वे ही शिर्डी- अहिल्यानगर मार्गे पुण्याला जाणार, अशी घोषणा लोकसभेमध्ये रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केली. यानंतर संगमनेरसह सिन्नर (जि. नाशिक), नारायणगाव, चाकण (जि. पुणे) या भागामध्ये नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली..Pune Nashik Railway : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेची ‘गती’ वाढणार! .रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी : बाळासाहेब थोरातमाजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, नाशिक पुणे रेल्वेकरिता आपण सातत्याने पाठपुरावा केला. याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पैसेसुद्धा देण्यात आले. मात्र सरकार बदलले आणि रेल्वेचा मार्ग पळवला गेला..विकासाच्या कामात होणारे हे राजकारण अत्यंत चुकीचे असून संगमनेर हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. त्यामुळे जनआंदोलनाचा लढा उभारून नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच झाली पाहिजे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.