Nashik News: यंदाचे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला; मात्र उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत आहेत. अशा अडचणीच्या परिस्थितीत कांद्याच्या भविष्यासाठी प्रोत्साहन देण्यासह कांदा बियाणे निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी हॉर्टिकल्चर एक्स्पोर्ट प्रोड्यूस असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे फलोत्पादन आयुक्त यांच्याकडे केली आहे. .गेल्या एप्रिलपासून कांद्याच्या बाजारात अपेक्षित सुधारणा नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिंग यांनी केंद्राकडे पत्र पाठवून सध्याची स्थिती व कांदादराच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. त्यात म्हटले आहे, विविध बाजारपेठांमधून मिळालेल्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांनी २०२५ हंगामातील साठवलेल्या रब्बी कांद्याच्या सुमारे ३५ ते ४० टक्के कांदा अधिक भाव मिळण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवला आहे. त्यामुळे आगामी काळात साठविलेल्या रब्बी उन्हाळ कांद्याची आवक चांगली राहण्याची स्थिती आहे..Onion Farming: साताऱ्यात पावसाची कांदा रोपे निर्मितीत अडचण .कर्नाटकमधील बंगलोर परिसरातील कांदा उत्पादक पट्ट्यात खरीप हंगामातील कांद्याची काढणी सुरू झाली आहे. या राज्यातील कांद्याची प्रतवारी चांगली आहे. तर राजस्थान आणि गुजरातमधूनही खरीप हंगामातील कांद्याचा आवक होणार आहे. ज्यामुळे बाजारात कांद्याची उपलब्धता सातत्यपूर्ण राहणार आहे. तर अहवालानुसार, महाराष्ट्रात या वर्षी लेट खरीप कांद्याची लागवड सरासरीपेक्षा अधिक आहे..Onion Farming: साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत .कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार का?लेट खरीप कांद्याचे पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची अपेक्षा आहे. कर्नाटकमधून नोव्हेंबर अखेरपर्यंत पुरवठा सुरू राहील. तर साठविलेल्या रब्बी उन्हाळ कांद्याची नियमित आवक आणि नवीन खरीप पीक यामुळे या वर्षी कांद्याची कमतरता भासण्याची शक्यता नसल्याचे नमूद केले आहे. त्यातून आयातदार देशांकडून कांद्याची मागणी कमी झाली आहे. ज्यामुळे निर्यातीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही. मात्र असे असताना केंद्र सरकार कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे..बियाणे निर्यातीवर बंदी घालण्याची मागणीबांगलादेश, श्रीलंका आणि शेजारील देश भारतीय कांदा बियाण्यांचा वापर करून उत्पादन घेत आहेत. ज्यामुळे त्यांचे परावलंबित्व कमी होऊन स्वयंपूर्णता येत आहे. त्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भविष्यात अडचण होणार आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्येही भारतीय कांद्याच्या बियाण्यांची मागणी वाढत आहे, जी दीर्घकाळात भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी संकट निर्माण करू शकते, असे विकास सिंह यांनी निदर्शनात आणून दिले आहे. त्यामुळे बियाणे निर्यातीवर बंदीची मागणी त्यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.