Raigad News: रायगड जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या विविध औद्योगिक प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. त्यांना योग्या मोबदला दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी उसर येथील गेल इंडिया पॉलिमर प्रकल्प, दिघी बंदर व त्यासंबंधित रेल्वेमार्ग, तसेच शहापुर-धेरंड येथील सिनारमास प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला..जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात झालेल्या या बैठकीत प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आपल्या विविध समस्यांचा पाढा मांडला. उसर येथील गेल प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जात असल्याच्या तक्रारी बैठकीत उपस्थित करण्यात आल्या. या संदर्भात १५ जानेवारी रोजी दिल्लीत पेट्रोलियम व नैसर्गिक वायू विषयक स्थायी समितीसमोर हे प्रश्न मांडण्यात येणार असल्याचे खासदार तटकरे यांनी स्पष्ट केले. गेल प्रकल्पग्रस्तांचा विषय सध्या केंद्र सरकारच्या संबंधित समितीपुढे सक्रिय असून, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले..Industrial Development: सू्क्ष्म, मध्यम उद्योग बळकटीकरण,निर्यातवृद्धीवर हिंगोलीत कार्यशाळा.दिघी बंदराच्या संदर्भात बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, बंदरातील वाहतूक अधिक सुलभ व्हावी यासाठी रोहा ते आगरदांडा दरम्यान मालवाहतूक रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व नागरिकांना योग्य मोबदला देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत जमिनीच्या दरांची निश्चिती करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले..Development of industry : उद्योग अन् उद्योजकता विकासाची वाटचाल.मच्छीमारांना अडथळा नसणारदिघी बंदरातील मालवाहतूक जहाजांमुळे स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेला अडथळा येऊ नये, यासाठी विशेष नियमावली तयार करण्याच्या सूचनाही खासदार तटकरे यांनी दिल्या. जहाजांची ये-जा ठरावीक चॅनलमधूनच व्हावी, तसेच मच्छीमारांना किमान ४८ तास आधी सूचना देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी बंदर प्रशासनाला दिले. यामुळे मच्छीमारांचे नुकसान टळेल आणि बंदराची मालवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..सिनारमास प्रकल्पग्रस्तांसाठी नवे पॅकेजअलिबाग तालुक्यातील शहापुर–धेरंड येथे प्रस्तावित सिनारमास कागद प्रकल्पाबाबतही खासदार तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. याच ठिकाणी सुमारे १५ वर्षांपूर्वी टाटा कंपनीचा वीज प्रकल्प प्रस्तावित होता. त्या काळात जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजमध्ये सुधारणा करून सिनारमास कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांसाठी नवे व अधिक लाभदायक पॅकेज मिळवण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.