Dharashiv News: बाजारपेठेतील अनिश्चिततेचा फटका पुन्हा एकदा बळिराजाला बसला आहे. हंगाम सुरू असताना कवडीमोल दराने सोयाबीन विकल्यानंतर आता सोयाबीनच्या भावात मोठी सुधारणा झाली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट अशी, की बहुतांश शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्याने या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांच्या नशिबी नसल्याचेच दिसत आहे..ज्यावेळी शेतकऱ्याच्या घरात माल असतो, तेव्हा भाव मातीमोल असतात आणि जेव्हा माल व्यापाऱ्यांच्या गोदामात पोचतो, तेव्हा भावात अचानक तेजी येते, हेच चित्र पुन्हा एकदा सोयाबीनच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. शासनाचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये असताना, हंगामाच्या सुरवातीला हजारो शेतकऱ्यांनी पैशांच्या निकडीपोटी आपले सोयाबीन ४ ते ४ हजार ५०० रुपयांनी खासगी बाजारात विकले. आता दर हमीभावापेक्षाही ५०० रुपयांनी वाढले असताना शेतकऱ्यांकडील साठा संपला आहे. त्यामुळे वाढलेल्या दराचे आकडे बघण्यापलीकडे बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती काही उरलेले नाही..Soybean Prices: शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर दरात उसळी.हमीभाव केंद्र ओस, बाजार समित्यांतही शांततासोयाबीन हंगामात सुमारे २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रांवर आपला माल विकला होता. मात्र, सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमालीची घटली आहे. आवक कमी असल्याने आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे सोयाबीनचे भाव वधारले आहेत. कधीकाळी हमीभावासाठी रांगा लावणारे शेतकरी आता दर वाढूनही घरात सोयाबीन नसल्याने हताश झाले आहेत..भाव वाढणे अन् पाडणे ठरवूनचजिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अडचणींमुळे आणि साठवणुकीची सोय नसल्याने काढणीच्या काळात ३,८०० ते ४,२०० रुपये दराने सोयाबीनची विक्री केली होती माल असताना भाव पाडायचे आणि माल संपला की भाव वाढवायचे, असे चक्र दरवर्षी राबविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. .Soybean Prices: सोयाबीनच्या दरामध्ये उसळी.शेतकऱ्यांना योग्यवेळी योग्य भाव मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचे शेतकरी सांगत आहेत. काढणीवेळी सोयाबीनला अत्यल्प दर होता. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण माल आधीच विकून टाकला. त्यानंतर आता अचानक दरवाढ झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे..दृष्टिक्षेपात...शासकीय हमीभाव५,३२८ रुपयेहंगामातील सरासरी विक्री दर४,०००-४,५०० रु.सध्याचा बाजारभाव५,८०० रुपये.यंदा अतिवृष्टीमुळे एक तर सोयाबीनचे उत्पादन हातात कमी आले. कसेबसे पीक वाचवून जे हाती आले ते हंगामाच्या सुरूवतीलाच कवडीमोल दराने विकले. मी दोन एकरात सोयाबीन पेरले होते. मला अवघा ३,८०० दर मिळाला. आता सर्व सोयाबीन विकून झाले आहे. तेव्हा भाव वाढत आहे. याचा आम्हाला काहीच फायदा नाही. दरांच्या चढ-उताराबाबत शेतकऱ्यांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे. यामध्ये सरकारनेच काहीतरी हस्तक्षेप केला पाहीजे.- अविनाश जाधव, शेतकरी, धाराशिव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.