Latur News: कापूस उत्पादनातील घट, बाजारातील कमी आवक आणि जागतिक पातळीवरील घडामोडींबरोबरच सीसीआयने कापसाची विक्री सुरू केल्यामुळे कापसाच्या भावात काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून मागील काही दिवसापर्यंत साडेसहा हजार ते सात हजार रुपये क्विंटल दरम्यान कापसाचे भाव स्थिर होते. सध्या भाव आठ हजार शंभर रुपयांपर्यंत वाढले आहेत. परंतु या वाढीचा फायदा शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांना झाला. शेतकऱ्यांच्या हातून गेल्यावर पांढऱ्या सोन्याची दरवाढ झाल्यामुळे कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. .यंदा खरीप हंगामात कापसाच्या लागवड क्षेत्रात मोठी घट झाली. जिल्ह्यात जळकोट व अहमदपूर तालुक्यात कापसाची लागवड शेतकरी मोठ्या संख्येने करतात. यंदाही काही शेतकऱ्यांनी लागवड केली. अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला. वेचणीसाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तीन वेचण्यांपर्यंत कापूस उपलब्ध होत असताना यंदा एका वेचणीतच कापसाचे उत्पादन संपले. .Cotton Rate: कापूस भाव पोचला हमीभावाच्या टप्प्यावर.केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाला ७ हजार ७१० रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार १०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला. तरी हमीभाव खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री केली. त्या वेळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना साडेसहा ते सात हजार रुपये भाव दिला. यंदा देशभरातच कापूस उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे बाजारात कापूस विक्रीसाठी कमी आला. .यातच काही दिवसांपूर्वी कॉटन फेडरेशन ऑफ इंडियाने (सीसीआय) यंदाच्या हंगामात खरेदी केलेल्या कापासाची विक्री करण्यास सुरुवात केली. यामुळे बाजारात कापसाचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी बाजारभावाने हमीदराचा टप्पा ओलांडला. क्विंटलमागे दीड ते दोन हजार रुपये सुधारणा झाली असताना दोन ते अडीच महिन्यांपू्र्वी कमी दराने विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा झाला नाही. .Cotton Rate: कापूस भाव पोचला हमीभावाच्या टप्प्यावर.वेचणी केल्यानंतर कापसाच्या भावात सुधारणा होईल, अशी थोडीही आशा नव्हती. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. सध्या अनेक शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यानंतर बाजारात भावात सुधारणा झाली आहे. अतिवृष्टीच्या तावडीतून शिल्लक राहिलेल्या कापसासाठी शेतकऱ्यांना यंदा उत्पादन खर्च जास्त मोजावा लागला. त्या तुलनेत कापसाला कमी भाव मिळाला. आता भाववाढ झाली तरी त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाच होत आहे..दोन महिन्यांपू्र्वी वेचणी झाली तेव्हा कापसाच्या दरात सुधारणेची थोडीही आशा नव्हती. यामुळे तातडीचे आर्थिक गरजा भागवण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री केली. आता दीड ते दोन हजारांनी दरात सुधारणा आहे. शेतकऱ्याकडे शेतीमाल विक्रीसाठी नसतो, तेव्हा भाव वाढतात. सहा ते साडेसहा हजाराने कापसाची विक्री केली. आता आठ हजारांवर भाव गेला आहे. यामुळे यंदा कापसामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.- शाम ढोबळे, शेतकरी, उमरगा रेतू, ता. जळकोट.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.