Dharashiva News: रब्बीचा हंगाम सुरू झाला की कृषीपंपाचा वापर वाढत जातो. अनेकदा रोहीत्रांसोबतच पाण्याची मोटर जळाल्याच्या तक्रारी वाढत जातात. विजेचा भार नियंत्रित करणारे कपॅसीटरचा वापर फार कमी शेतकरी करतात त्याचबरोबर अॅटोस्विचचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परिणामी अचानक विजेचा भार वाढल्याने वीज यंत्रणे सोबतच पाण्याची मोटर जळण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीपंपाचा वापर योग्य ते कपॅसिटर लावूनच करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. .वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने बहुतांश शेतकरी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होणे तसेच पाण्याची मोटर जळन्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान होवू नये तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कपॅसिटर बसवावेत..Teeth Care Tips : 'हे' पदार्थ तुमच्या दातांना पोहोचवतील हानी आत्ताचं खाणं टाळा.प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कपॅसिटरमुळे योग्य दाबाचा वीजपुरवठा होतो, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होते. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी कृषिपंपास कपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली आहे. त्यामुळे ज्यांनी कपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत. कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे..कृषिपंपास कपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. पुरेशा दाबाने वीज पुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांने कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते..सोलापुरात महावितरणच्या ‘एक गाव-एक दिवस’ उपक्रमाला सुरुवात.ऑटोस्विचचा वापर टाळावाराज्यात ४५ लाखांहून अधिक कृषिपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना 'ऑटोस्विच' लावले असल्याचे दिसून येते. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. .परिणामी रोहित्रांवरील भार एकाच वेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना 'ऑटोस्विच' लावू नये तसेच इतर शेतकऱ्यांनी ते लावले असल्यास त्वरीत काढून टाकावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.