Amaravati News: चांदूरबाजार तालुक्यात अतिवृष्टी, नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १२) तहसील कार्यालयावर ‘कठपुतळी आंदोलन’ करण्यात आले. .अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकनुकसानीबाबत शासनाने मदतीची घोषणा केली असली तरी केवायसी पूर्ण करूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. बँक, तलाठी व तहसील कार्यालयांत फेऱ्या मारूनही ठोस उत्तर मिळत नसल्याने शेतकरी हताश झाल्याची भावना आंदोलनात व्यक्त झाली..Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत.पीकविमा योजनेत वेळेवर हप्ते भरूनही नुकसानभरपाई मिळत नसल्याने ही योजना केवळ कागदोपत्री उरल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला. त्याचप्रमाणे तूर व हरभरा काढणी अंतिम टप्प्यात असतानाही तालुक्यात शासकीय खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात माल विकावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले..कृषीपंपांना १ जानेवारीपासून रात्री वीजपुरवठा देण्याच्या निर्णयालाही तीव्र विरोध करण्यात आला. आंदोलनानंतर तहसीलदारांना सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तत्काळ निर्णय व अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.