निरंजन आगाशेUdarikanranantarcha Maharashtra Book: पुस्तकाचे नाव : उदारीकरणानंतरचा महाराष्ट्रलेखन, संशोधन : मुक्ता कुलकर्णी, विवेक घोटाळेसंशोधन साहाय्य : केदार देशमुख, सोमिनाथ घोळवेप्रकाशक : द युनिक फाऊंडेशन प्रकाशनपृष्ठे : ३२६ मूल्य : ८०० रु..सध्या आपल्याकडील एकूण राजकीय संभाषित कमालीचे ‘केंद्रा’कर्षी झाले आहे. चर्चेचा रोख सतत केंद्रीय पातळीवर राहिल्याने बऱ्याचदा जमिनीवरचे वास्तव समजून घेण्यात अडचणी निर्माण होतात. सर्वच बदलांच्या संदर्भातील अपुरे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. उदाहरणार्थ, आर्थिक सुधारणांबद्दल खूप बोलले जाते; परंतु त्यासंबंधीचे बरेच कळीचे कायदे हे राज्यांच्या अखत्यारीत येतात. ते जोवर केले जात नाहीत, तोवर प्रत्यक्षात बदल होतच नाहीत. .Book Review: ‘तर्कतीर्थां’च्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र धांडोळा.अर्थात, हे इतरही धोरणात्मक विषयांच्या संदर्भात कमी-अधिक प्रमाणात घडले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या आर्थिक-राजकीय सद्यःस्थितीचा, बदलत्या प्रवाहांचा वेध घेणाऱ्या प्रस्तुत अभ्यासप्रकल्पाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. उदारीकरणानंतरच्या महाराष्ट्राचा वेध त्यात घेतला असून, विद्यार्थी, अध्यापक, जिज्ञासू व्यक्ती; एवढेच नव्हे तर धोरणाकर्त्यांनाही ‘उदारीकरणानंतरचा महाराष्ट्र’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल..बऱ्याचदा वेगवेगळ्या सामाजिक उद्रेकांच्या मुळाशी राजकीय अर्थव्यवस्थेतले पेच असतात. त्यातील गुंतागुंत, हितसंबंध हे सगळे लक्षात घेतल्याशिवाय त्या उद्रेकांचाही अर्थ नीट कळत नाही. त्यादृष्टीनेही अशा अभ्यास-प्रकल्पांची आवश्यकता असते. आपल्याकडे ‘शेतीतील अरिष्ट’ या विषयावर सातत्याने बोलले जात आहे. हे अरिष्ट कसे गडद होत गेले, याची तपशीलवार माहिती या अंकात वाचायला मिळते. केवळ आकडेवारीवर विसंबून न राहता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणाचा आधारही या अभ्यासाला असल्याने शेतीच्या अरिष्टाचे स्वरूप कळण्यास मदत होते. शेतीचे तुकडे होणे, अपुरे सिंचन, विकासाचा प्रादेशिक असमतोल, शेतीतील कमी होत गेलेली सरकारी गुंतवणूक अशा अनेक समस्यांचा परामर्श या निमित्ताने घेतला गेला आहे..शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल केले किंवा नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व्हेक्षणात केला गेला. त्यात असे आढळले की, पारंपरिक पद्धतीने शेती करण्याकडेच बहुतांश शेतकऱ्यांचा कल आहे. ज्या २७ टक्के प्रतिसादकांनी शेतीतंत्रात बदल केला असे सांगितले, त्यांपैकी बहुतेक जण सोयाबीन आणि ऊस अशी पिके घेणारे होते. भांडवली विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचे विस्थापन होत असताना त्यांना संघटित क्षेत्रातील रोजगारात सामावले जात नाही, तर मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रातच त्याला काम करावे लागते आहे, यांसारखी अनेक निरीक्षणे यात नोंदवलेली आहेत..Book Review: एका निखळ भारतीयाची शोधयात्रा .आर्थिक उदारीकरणामुळे एकूण उद्यम वाढेल, विकासाचा मार्ग मोकळा होईल, नोकरशाहीचे प्रस्थ कमी होईल, असे सांगितले जात असे. या अभ्यासात आढळून आलेले वास्तव त्या समजुतीला काही प्रमाणात तरी छेद देते. महाराष्ट्रात राजकीय नेतृत्व व शासकीय अधिकाऱ्यांपैकी काही अधिकारी हे उद्योजक, बिल्डर, कंत्राटदार, दलाल यांच्या संगनमताने सार्वजनिक विकासप्रक्रियेला आपल्या खासगी हितसंबंधांसाठी विशिष्टप्रकारे चालना देत आहेत, हे निरीक्षण समाजवास्तवाचा अधिक खोलवर विचार करायला प्रवृत्त करणारे आहे..महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय प्रवाहाचा वेध हा अभ्यास घेतो. दोन तुल्यबळ आघाड्यांची स्पर्धा, असे महाराष्ट्राच्या राजकारणाचे २००४ व २००९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपासून सूत्र बनले; पण २०१४ पासून ते बदलत गेले. राज्य भाजपचा विस्तार झाला. चार मोठे पक्ष आणि इतर लहान पक्ष अशी बहुपक्षीय स्पर्धा आकाराला आली. या बदलांविषयीचे या पुस्तकातील विवेचन राजकीय प्रक्रियेविषयी वाचकाला सजग करणारे आहे..या संपूर्ण अभ्यासाचे निष्कर्षही साररूपाने अखेरच्या प्रकरणात मांडण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे, की उदारीकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व हे शहरी व सेवाक्षेत्रातील त्यांच्या गुंतवणूकक्षमतेवर उभे राहताना दिसते. ग्रामीण व शेतीतील हितसंबंध हा जो महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाचा पाया होता तो संपुष्टात येऊन नवी शहरे उभारणारे बिल्डर, खासगी साखर कारखाने, खासगी दूध उत्पादक संघ चालविणारे, शिक्षणसम्राट, जमीन व्यवहारांतील मध्यस्थ यांचे राज्याच्या अर्थ-राजकारणावर वर्चस्व निर्माण झाले आहे..उदारीकरणानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकीय अर्थव्यवस्थेत जे मूलगामी बदल घडून आले, त्यांचे एक व्यापक चित्र सैद्धान्तिक अभ्यास आणि क्षेत्रीय अभ्यास यांच्या समन्वयातून वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे करण्यात या अभ्यासप्रकल्पाला यश आले आहे, असे म्हणता येईल. हे पुस्तक वाचल्यानंतर सार्वजनिक धोरणनिर्मितीसाठी दिशादर्शक असे काही विवेचनही पुढच्या काळात या अभ्यासकांनी करायला हवे आणि सरकारनेही त्याची दखल घ्यावी, असे मनात आल्याशिवाय राहात नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.