Maharashtra Agriculture : नांदेड अत्यल्प पावसामुळे नांदेड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर विष्णुपुरी खोऱ्यात उपलब्ध सुमारे १४६ दलघमी पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात दोन, रब्बीत तीन आणि उन्हाळ्यात तीन अशा एकूण आठ पाणीपाळ्या द्याव्यात, अशी मागणी मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे..प्रा. मोरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, विष्णुपुरी खोऱ्यात विष्णुपुरी प्रकल्पात सुमारे ८० दलघमी, अंतेश्वर बंधाऱ्यात ३० दलघमी आणि दिग्रस बंधाऱ्यात ३६ दलघमी असा एकूण अंदाजे १४६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. विष्णुपुरी प्रकल्पाची एकूण क्षमता सुमारे ८४ दलघमी असून, सध्या तो सुमारे ९८ टक्के भरलेला आहे..Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन.उपलब्ध पाणीसाठ्यापैकी नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ३८ दलघमी, तर एमआयडीसीसाठी पाच दलघमी पाणी राखीव आहे. त्यामुळे एकूण दलघमी पाणी राखीव ठेवल्यानंतर सुमारे १०३ दलघमी पाण्याचे नियोजन करता येऊ शकते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे..प्राथमिक अंदाजानुसार, पहिल्या पाणीपाळीसाठी सुमारे सात दलघमी, तर त्यानंतरच्या सात पाणीपाळ्यांसाठी प्रत्येकी पाच दलघमी, असे एकूण सुमारे ४२ दलघमी पाणी आवश्यक आहे. आठ पाणीपाळ्यांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून दिल्यानंतरही उर्वरित पाण्याचा वापर ग्रामीण भागातील नागरिक, जनावरे आणि चारा पिकांसाठी करता येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे..Lower Dudhna Project : निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठ्यात ३.४४३ दलघमी घट.पाण्याची परिस्थिती भविष्यात आणखी गंभीर झाल्यास जायकवाडी प्रकल्पातून नांदेडपर्यंत पाणी आणण्यासाठी पूर्वनियोजन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनावर प्रा. शिवाजी मोरे यांच्यासह त्र्यंबक पाटील जानापुरीकर, माधवराव देसाई, गोविंदराव मुकदम, रघुनाथ मोरे, दत्तराव पाटील हांडे, संतोष पाटील वाडीकर, आनंदराव मोरे, लिंगोजी पाटील, शिवाजी शिंदे, नागोराव कस्तुरे दगडगावकर, खुशालराव पाटील आणि सुरेशराव बोरगावकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..तातडीने बैठक घेण्याची मागणी...विष्णुपुरी प्रकल्पाचे संचालन मेकॅनिकल, हायड्रोलिक आणि सिव्हिल विभागांमार्फत केले जाते. या तिन्ही विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून उपलब्ध पाण्याचे वास्तववादी, कार्यक्षम आणि पारदर्शक नियोजन करणे आवश्यक आहे. नांदेड सर्कल जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन आठ पाणीपाळ्यांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी प्रा. मोरे यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.