Pune News: बरकीदरा येथील पाझर तलावाने यंदा लवकरच तळ गाठल्याने पुढील चार महिने या भागातील वाड्या- वस्त्यांवर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. वाड्या-वस्त्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी या तलावातील पाण्याचा उपयोग होत असतो. .परंतु या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यातच पाणीटंचाई जाणवू लागल्याने पुढील चार महिने पाण्यासाठी वणवण करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत..Global Water Crisis: जागतिक पातळीवर पाणी संकट गंभीर.भारत फोर्ज व महाराष्ट्र आरोग्य मंडळ यांच्या माध्यमातून याठिकाणी पाझर तलाव तयार करण्यात आला असून या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे..हा गाळ काढला तर पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे व त्यामुळे उन्हाळ्यातील दिवसात पाण्यासाठी होणारी वणवण थांबेल. याकरिता ‘सीएसआर’ फंडातून काम होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सरपंच बबन मोहरे यांनी सांगितले..Drinking Water Shortage: उन्हाच्या चटक्याने पाण्याची मागणी वाढली.या गावातील बांबळे वस्ती, भारमळ वस्ती, उघडेवाडी, बरकीदरा, हिलेवाडी, मोहरेवाडी येथील शेतकऱ्यांना या तलावातील पाण्याचा जनावरांसाठी, शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत असतो. तसेच या भागात छोटे बंधारे, कूपनलिका, विहीरी, बोअरवेल यासारखे पाण्याचे स्रोत आहेत..परंतु सध्या हे स्रोत आटू लागल्याने यापुढे पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे यावर्षीही या भागात पंचायत समितीच्या वतीने पाण्याचे टँकर सुरू होतील, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. आदिवासी भागाच्या उशाशी असलेल्या डिंभे धरणाचे पाणी जवळ असले तरी अनेक वर्षांपासून स्थानिकांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.