Pune News: रब्बी हंगामासाठी (२०२५-२६) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) ६८९ कोटी ३२ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत ३६९ कोटी ८८ लाख ३१ हजार रुपये म्हणजेच ५३ टक्के वाटप केले आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. .गेल्या वर्षी रब्बी हंगामातील पिकांसाठी ६८५ कोटी ७३ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. या काळात सुमारे २८ हजार ५०१ शेतकऱ्यांना २०६ कोटी ८६ लाख ४२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. यंदा त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीत मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत रब्बीत पेरण्या करणे शक्य होईल..Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वाटपातही बँकांचा हात आखडता.अनेक ठिकाणी ऊस गाळपास गेल्यानंतर शेतकरी गहू, हरभरा अशा पिकांच्या पेरण्या करतात. परंतु चालू वर्षी कारखाने उशिराने सुरू होत असल्याने गहू, हरभरा पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात उशिराने होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येत्या काळात कर्ज वाटपात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावांमध्ये असलेल्या ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करते व या सोसायट्यांकडून ते सभासदांना दिले जाते..सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याज दराने पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने कर्जवाटप होते. त्यामुळे रब्बीसाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी, पूरक व्यवसायासाठी अल्प मुदतीचे कर्ज दिले जात आहे. हे उद्दिष्ट यंदाचा रब्बी हंगाम संपेपर्यंत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली..Crop Loan: रब्बी पीककर्ज वाटपाचे २.८१ टक्के साध्य.विविध पिकांसाठी दिले जाते कर्जरब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळींब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांसाठी पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. त्यामुळे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. आंबेगाव, बारामती,.भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांत रब्बी हंगामात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. बँकेकडून रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीत काही वेळा शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामाचे नियोजन करून पिके घेतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.