Akola News: राज्यात कृषी समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर जिल्ह्यांकडून नावीन्यपूर्ण योजनांसाठी नियोजन मागवण्यात आले. मात्र, आता आयुक्तालयाने बुधवारी (ता.१९) पत्र काढत कृषी समृद्धी योजनेअंतर्गत जिल्हा नावीन्यपूर्ण योजनेत सद्यस्थितीत पुढील आदेशापर्यंत कोणतेही दायित्व निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे. .त्यामुळे स्थानिक यंत्रणांनी नियोजित केलेल्या नावीन्यपूर्ण योजनांना ब्रेक लागणार की काय, अशी शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. कृषी आयुक्तालयातील कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक सुनील बोरकर यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र समाज माध्यमांत व्हायरल झाले आहे.राज्यात मोठा गाजावाजा करीत कृषी समृद्धी योजना राबवली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी निधीची तरतूद केल्याचेही मुख्यमंत्र्यांपासून कृषिमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच जाहीरही केले. .Krishi Samruddhi Yojana: काय आहे कृषी समृद्धी योजना; शेतकऱ्यांना काय फायदे?.मात्र, आता या पत्रामुळे या रब्बी हंगामात प्रत्येक जिल्ह्यात योजनेअंतर्गत नियोजित केलेले नावीन्यपूर्ण उपक्रम रखडण्याची भिती आहे. कृषी समृद्धी योजना राबविण्यास मान्यता दिल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला नियोजन मागवण्यात आले. जिल्हा यंत्रणांनी आपापल्या जिल्ह्यातील हवामान, पोषक स्थिती, शेतकरी संख्या अशा सर्व बाबींचा विचार करून नियोजनाचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. .रब्बी हंगामातील योजनांच्या अनुषंगाने स्थानिक यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोचवणे सुरूही केले होते. यावर्षी विदर्भात रब्बी हंगामात नवनवीन पिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण योजनेतून अनुदान देण्याविषयी सांगितले जाऊ लागले होते. परिमाणी मोठ्या संख्येने शेतकरी या पिकांच्या लागवडीकडे वळायलाही सुरुवात झाली होती. अशातच कालच्या पत्राने जिल्हा.#Shorts: शेतकऱ्यांसाठी ॲग्रोवनची कृषी समृद्धी बक्षीस योजना| ॲग्रोवन.नावीन्यपूर्ण योजनांना अचानक ब्रेक लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी आयुक्तालयाने स्पष्ट आदेश काढत जिल्हा नावीन्यपूर्ण योजनेसंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत थांबण्यास सांगितले आहे. कोणतेही नवीन दायित्व जिल्ह्यांनीनिर्माण करू नये, असे स्पष्ट निर्देशच दिले आहेत. .पाचशे कोटी राखीवराज्यात २०२५-२६ साठी तब्बल ५०० कोटींचा निधी जिल्हास्तरीय योजनांसाठी राखीव ठेवला असतानाच हा आदेश काढल्याने जिल्ह्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यांकडून अंमलबजावणीबाबत सतत विचारणा होत असतानाच पुण्यातून आलेल्या पत्राने गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने चित्र स्पष्ट होण्याची गरज शेतकरी व्यक्त करू लागले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.