Parliament Budget Session PM Narendra Modi Speech In Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.५ फेब्रुवारी) राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. ''गेल्या काही दिवसांत, आम्ही जगातील ९ मोठ्या आणि महत्त्वाच्या देशांसोबत द्विपक्षीय व्यापार करार केले आहेत. २७ देशांचा समावेश असलेल्या युरोपियन युनियनसोबतचा करार हा या सर्व करारांपैकी सर्वात मोठा आहे,'' असे पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत सांगितले..युरोपियन युनियनसोबतचा व्यापार करार असो, अमेरिकेसोबतचा नुकताच झालेला व्यापार करार असो, याबाबत काल आपल्या पियुष गोयल यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली. संपूर्ण जग या व्यापार कराराचे उघडपणे कौतुक करत असल्याचे मोदी म्हणाले. .विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, मोदींचा खर्गेंना टोलाराज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलण्यास सुरुवात केल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एलओपी (राहुल गांधी) यांना बोलू द्या, हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा त्यांनी दिल्या. राज्यसभेत विरोधी पक्षाचे खासदार गोंधळ घालत असताना पंतप्रधान मोदी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार टोला लगावला, "खर्गे यांचे वय लक्षात घेता, मी विनंती करतो की, त्यांना बसूनच घोषणाबाजी करू द्यावी, जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही. त्यांच्या मागे तरुण लोक आहेत. त्यामुळे, कृपया खर्गे यांना बसूनच घोषणाबाजी करण्याची परवानगी द्या." असे मोदी म्हणाले..India US Trade Deal: ...तर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, भारत- अमेरिका करारावरून शेतकरी संघटनांचा इशारा.विरोधकांचा सभात्यागत्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. जो लोक 'थक गए, चले गए' असा टोलाही मोदींना विरोधकांना लगावला. काँग्रेस सरकारांकडे कोणतीही दूरदृष्टी नव्हती, असा आरोप त्यांनी केला.''आपची बरीच शक्ती त्यांच्या (काँग्रेसच्या) चुका सुधारण्यात जात आहे. आज तुम्ही पाहिले असेलच की देश धोरणाच्या आधारावर चालत आहे. म्हणूनच जगाचा आपल्या देशावर विश्वास वाढत आहे.'' असे मोदी म्हणाले..India US Trade Deal: अमेरिकेपुढे नांगी.जगाचे भारताकडे आकर्षण वाढत आहे. त्यांना भारताच्या प्रतिभेचे महत्त्वदेखील समजले आहे. आज आपल्याकडे जगातील सर्वात महत्त्वाचे युवा टॅलेंट आहे, ज्यांच्याकडे स्वप्ने, संकल्प आणि सामर्थ्य आहे. शक्तीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. भारत आज जगातील आव्हानांवर उपाय शोधणारा देश बनला आहे..जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपण जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतो. पण काही लोकांनी अशी परिस्थिती निर्माण केली की देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर घसरली. आज आम्ही तिसऱ्या क्रमांकाकडे जाण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. आजचा भारत प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने भरलेला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. .विकसित भारताच्या दिशेने प्रवास करताना गेली काही वर्षे देशाच्या वेगाने प्रगतीची आणि विकासाची राहिली आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, समाजाच्या प्रत्येक घटकात हा परिवर्तनाचा हा काळ आहे. देश योग्य दिशेने वेगाने पुढे जात आहे. भारत जगाशी स्पर्धा करण्याची पूर्ण तयार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. .'काँग्रेसने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला'काँग्रेसने विश्वासघात करण्यात देशातील अन्नदाता शेतकऱ्यालाही सोडले नाही. या देशात १० कोटी शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. त्यांनी छोट्या शेतकऱ्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. पण आमच्या मनात छोट्या शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आणि वेदना होती, आम्हाला वास्तवाची जाणीव होती आणि म्हणूनच आम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणली आणि इतक्या कमी वेळात आम्ही आमच्या छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात ४ लाख कोटी रुपये जमा केले, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगत काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.