Minor Irrigation Projects: तापमानात वाढ झाली. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला. उपसा सुरु असल्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट सुरु आहे. गुरुवारी (ता. २५) घेतलेल्या नोंदणीनुसार लघु तलावांमध्ये सरासरी १२.६५६ दलघमीनुसार ३० टक्के तर मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी २६.२३६ दलघमीनुसार ५० टक्के पाणीसाठा होता. मागील २० दिवसांमध्ये लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात ९ टक्के तर मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात १३ टक्के घट झाली आहे. जिंतूर तालुक्यातील जोगवाड, चिंचोली, आडगाव, केहाळ या ४ लघु तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे..जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे. पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता.६मार्च ) घेतलेल्या नोंदणीनुसार लघु तलावांमध्ये सरासरी १६.३०४ दलघमीनुसार ३९ टक्के तर मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ४३.८२२ दलघमीनुसार ६३ टक्के पाणीसाठा होता. जिल्ह्याचे तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअस पर्यंत पर्यंत पोहोचला आहे. बाष्पीभवन, सिंचन आर्वतने, उपसा यामुळे लघु तसेच मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट सुरु आहे..Reservoir Levels Drop: सातपुड्यातील सिंचन प्रकल्पांत जलसाठा घटला.लघु तलावांमध्ये ३० टक्के पाणीसाठा....गुरुवारी (ता. २५) घेतलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार २२ पैकी जोगवाड, चिंचोली, आडगाव, केहाळ या ४ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. ० ते २५ टक्के पाणीसाठा असलेल्या लघु तलावांची संख्या १० असून त्यात.Reservoir Levels Drop: पाणीसाठ्यामध्ये तीन टक्क्यांची घट.टाकळगाव, कोद्री, देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी, कवडा, मांडवी, दहेगाव हे तलाव आहेत. २६ ते ५० टक्के पाणीसाठा असलेल्या लघु तलावांची संख्या ४ असून त्यात नखातवाडी, तांदुळवाडी, राणीसावरगाव, पाडाळी हे तलाव आहेत. ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा असलेल्या लघु तलावांची संख्या ३ असून त्यात पेडगाव, झरी, पिंपळदरी हे तलाव आहेत. ७५ ते १०० टक्के पाणीसाठा असलेल्या लघु तलावांची संख्या १ असून त्यात आंबेगाव तलाव आहे.२५ मार्च २०२५ रोजी लघु तलावात ७.५२५ दलघमीनुसार १८ टक्के पाणीसाठा होता..तसेच उन्हाळी सिंचनासाठी आवर्तने सोडण्यात आल्यामुळे पाणीसाठ्यात घट झाली आहे.२०२५ मध्ये २५ मार्च रोजी करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ८.२५४ दलघमीनुसार ३३ टक्के तर मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये १२.२५४ दलघमीनुसार ४५ टक्के पाणीसाठा होता..मध्यम प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा......करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे.मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता. २५) घेतलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार करपरा प्रकल्पात ९.०४८ दलघमी नुसार ३६ टक्के तर मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये २७.१४१ दलघमी नुसार६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. दोन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी २६.१३६ दलघमीनुसार ५० टक्के पाणीसाठा होता. रब्बी,.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.