Parbhani News : जिल्ह्यात यावर्षीच्या (२०२५) ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचा परभणी, सोनपेठ, पालम, पूर्णा या ४ तालुक्यातील २५२ गावांतील १ लाख ५० हजार ४१२ शेतकऱ्यांच्या ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे..बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत आर्थिक मदत देण्यासाठी ७६ कोटी ९१ हजार ७ हजार २०० रुपये निधी आवश्यक आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. परभणी जिल्ह्यात यंदा ऑगस्ट महिन्यात अनेक मंडलात मुसळधार पाऊस झाला. कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्यामुळे ओढे, नाल्या, नद्यांना पूर आले. .Rain Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान; पंचनाम्यासाठी पाणी ओसरण्याची प्रतीक्षा.पुराचेपाणी शेतामध्ये शिरल्याने सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद पिके कित्येक तास पाण्यात बुडाली. जमीन खरडून गेल्याने मुळ्या उघड्या पडल्या. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका पूर्णा, पालम तालुक्यातील पिकांना बसला. त्यानंतर परभणी, सोनपेठ तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. .Rain Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस मंडलांत अतिवृष्टी.पीक नुकसानीचे संयुक्त पंचनामे पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र अंतिम करण्यात आले. त्यानुसार परभणी तालुक्यातील १९ हजार १३६ हेक्टरवरील, सोनपेठ तालुक्यातील १४ हजार ५६ हेक्टरवरील, पालम तालुक्यातील २७ हजार ४३० हेक्टरवरील तर पूर्णा तालुक्यातील २९ हजार ८६१ हेक्टरवरील जिरायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले..३३ टक्केच्यावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २ हेक्टर मर्यादेत अर्थसाहाय्य देण्यासाठी जिरायती पिकांसाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपयेनुसार एकूण ७६ कोटी ९१ लाख ७ हजार २०० रुपये निधी आवश्यक, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.