Nashik News: सटाणा तालुक्यातील भाक्षी आणि मुळाणे या दोन गावांच्या सीमेवरील तीन पिढ्यांपासून बंद असलेला महत्त्वाचा शिव पाणंद रस्ता अखेर मोकळा झाला. मुळाणे येथील शेतकरी भगवान आहिरे यांनी हा स्तुत्य उपक्रम स्वखर्चातून हाती घेऊन पूर्णत्वास नेला. .गेली अनेक दशके हा रस्ता बंद असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे हाल होत होते. शेतात ये-जा करणे आणि शेतीमाल वाहून नेणे अत्यंत जिकिरीचे झाले होते..Panand Roads: मार्चपर्यंत ४५ हजार किलोमीटर पाणंद रस्ते पूर्ण होणार; मंत्री गोगावले .यामुळे जवळपास १५ ते २० हेक्टर शेतजमीन पूर्णपणे कोरडवाहू अवस्थेत पडून होती. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन, भगवान आहिरे यांनी सामाजिक बांधिलकी आणि शेतकरी हित जपण्याच्या भावनेतून हा शिव पाणंद रस्ता आपल्या स्वखर्चातून पूर्ववत केला. .Panand Road Survey: आठ हजार ७७० पाणंद रस्त्यांचे सर्व्हेक्षण.आता हा रस्ता सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा वापरासाठी खुला झाला आहे, ज्यामुळे शेतजमिनीची मशागत करणे आणि उत्पादन वाढवणे सोपे होणार आहे. .या रस्त्याच्या कामासाठी गावातील पोलिस पाटील संदीप पाटील यांच्यासह कारभारी आहिरे, धनंजय आहिरे, किरण आहिरे, अतुल आहिरे, बाळासाहेब ह्याळीज, सुनील साबळे आदी शेतकऱ्यांनी सक्रिय सहकार्य केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.