Rainfall Shortage impact on Agriculture: राज्याच्या खरिपावर ‘एल निनो’ची गडद छाया आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरा न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलेला असतानाही दीड लाख हेक्टरवर झालेला धूळपेरा चिंतेचा विषय झाला आहेत. दुसऱ्या बाजूला पावसाअभावी राज्यातील भात रोपवाटिकांचे नियोजन संकटात आले आहेत. .मॉन्सूनच्या पावसाअभावी राज्याच्या खरीप २०२६-२७ हंगामाचे वेळापत्रक जूनच्या सुरुवातीलाच विस्कळीत झाले आहे. गेल्या हंगामात १३ जूनअखेर राज्यात ४.१३ लाख हेक्टरवर पेरा झाला होता. यंदा हाच पेरा १.४० लाख हेक्टरपर्यंत झाला आहे. राज्याचे खरीप सर्वसाधारण क्षेत्र १४४ लाख हेक्टर असून, यंदा १५८ लाख हेक्टरपर्यंत पेरा करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते..Agriculture Water Crisis: कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून कर्नाटकला पाणी बहाल : शेट्टी.मात्र आता नियोजनानुसार सरासरीपेक्षा जास्त पेरा होण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय दीड लाख हेक्टरच्या आसपास झालेल्या धूळपेरण्याचे काय होणार हादेखील चिंतेचा विषय आहे. येत्या ४-५ दिवसांत चांगला पाऊस झाल्यास धूळपेरण्या तरतील; मात्र पावसाने हुलकावणी दिल्यास बारमाही सिंचन सुविधा नसलेल्या क्षेत्रात दुबार पेरा करावा लागू शकतो..राज्यात १ जून ते १५ जून या दरम्यान सरासरी १०३ मिलिमीटर पाऊस होत असतो. त्यामुळे पश्चिम कोकण, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भात होणाऱ्या धूळपेरण्या तग धरतात. मात्र यंदा या कालावधीत केवळ २७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६१ मिलिमीटर पाऊस झाला होता. सोलापूर, बीड, सांगली व धाराशिवचा काही भाग वगळता गेल्या पंधरवड्यात सर्वत्र ७५ टक्क्यांच्या खालीच पाऊस झाला. त्यातही पुन्हा १९ जिल्ह्यांमध्ये ० ते २५ टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे खरीप पेरा १५ जूनपर्यंत केवळ १.४१ लाख हेक्टरवर झाला असून तो एकूण सरासरीच्या केवळ एक टक्का इतका आहे..El Nino Crisis: ‘एल निनो’ आणि कोरडा उपदेश.येत्या चारपाच दिवसात पाऊस न झाल्यास भात रोपवाटिकांचे नियोजन कोलमडेल व त्याचा परिणाम भाताच्या एकूण पेऱ्यावर होईल, असे सांगितले जात आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच १५ जूनपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार असल्याने पेरण्यांची घाई करू नका, असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरण्या टाळल्या. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात शेतकऱ्यांनी नेमकी काय भूमिका घ्यायची, या बाबत कृषी विभागाने सल्ला सूचना जारी केलेली नाही..खरीप पेरण्यांची अंदाजे स्थिती (१५ जूनअखेर)पीक- सरासरी क्षेत्र गेल्या वर्षीचा पेरा चालू वर्षाचा पेराधान १५०२०५ १९००७ ४८०४ (०%)खरीप ज्वारी २०२९२३ २०७ १४७७० (७९%)बाजरी ४८१६८६ २६४५५ ५८८ (०%)नाचणी ७०९०३ ३९० ४९० (१%)मका ९३३८१९ ३३०९५ १०२१६ (१%)तूर १२७७१२३ २५४६९ २९५३ (०%)मूग ३०२४५९ २५४५९ २९३ (०%)उडीद ३५९३२९ ४६३९२ २३६ (०%)भुईमूग १६६३५६ ३९१२ ३३९ (०%)तीळ ८६३६ १० ० (०%)कारळे ६२४५ ५ ०(०%)सूर्यफूल ११६०३ ६७ १४(०%)सोयाबीन ४७२१४८८ १०२०३९ ७९८८ (०%)कापूस ४२४७२१२ १३२७१२ ११२०८९ (३%)- सर्व आकडे अंदाजे व हेक्टरमध्ये आहेत.- कंसातील आकडे गेल्या हंगामातील पेरण्यांच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी दर्शवितात..राज्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे येत्या पंधरवड्यात पाऊस झाल्यास पीक पद्धतीत फारसा बदल होणार नाही.रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.