Government Campaign : विविध विभागांच्या योजना एकाचवेळी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. अधिकाधिक नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले..राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ बुधवारी (ता. २२) चांदवड येथे झाला..Maharajswa Campaign: महाराजस्व अभियानाचा ग्रामीण जनतेने लाभ घ्यावा .यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नगराध्यक्ष वैभव बागुल, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, डॉ. नितीन गांगुर्डे, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते..आमदार डॉ. आहेर म्हणाले, की नागरिकांना विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. विविध विभागांच्या योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आवास योजनेसाठी वडाळा भोई येथील गायरान जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे २०४ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता आल्याचे त्यांनी सांगितले..Namo Mahasamman Benefits: नमो महासन्मानचा लाभ ‘सामाजिक न्याय, आदिवासी’तून.यावेळी आमदार डॉ. आहेर आणि विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या हस्ते महसूल, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, ग्रामविकास, वन, परिवहन, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पंचायत समिती, नगरपरिषद आदी विविध विभागांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले..Jitendra Papalkar: शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्याच पाहिजे.उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी सांगितले, की समाधान शिबिराच्या माध्यमातून १३८ शेतरस्ते मोकळे करण्यात आले असून, १,४६४ रस्त्यांना क्रमांक देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या २७ हजार ३२७ दाखल्यांचे आतापर्यंत वितरण करण्यात आले आहे. सध्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू असून, नागरिकांनी आपले अर्ज बीएलओमार्फत भरून जमा करावेत, असे आवाहन त्यांनी केले..प्रास्ताविक तहसीलदार अनिल चव्हाण यांनी केले. गटविकास अधिकारी श्री. साबळे यांनी पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिबिरस्थळी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. कागदपत्रांची पूर्तता केलेल्या नागरिकांना तेथेच थेट लाभ व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.