Akola News: अकोट उपविभागातील ग्रामीण भागात वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेती, पशुधन आणि मानवी जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. रानडुक्कर, हरीण, निलगाय, वानर तसेच बिबट्यासारख्या हिंसक प्राण्यांमुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे वनविभाग व प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा ३० जानेवारीला आयोजित नरनाळा महोत्सवावर बहिष्कार टाकून हा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला. .या बाबत माहिती देण्यासाठी रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी असून शेतकरी, शेतमजूर व सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगत वसलेल्या आदिवासी वस्तीतील नागरिक भयग्रस्त झाले असल्याचे सांगितले..Wildlife Crop Damage: वन्यप्राण्यांकडून केळी, भाजीपाला पिकांची हानी.श्री. कौठकर म्हणाले, की वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास ३० जानेवारी रोजी होणाऱ्या नरनाळा महोत्सवावर शेतकरी बहिष्कार टाकतील. वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान दिवसेंदिवस वाढत असून २०१६-१७ या वर्षात अकोला जिल्ह्यातील तब्बल ३२५८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्याबदल्यात वनविभागाने १.१७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली. मात्र ती अत्यंत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. .Wildlife Crop Damage: शेतात वन्यप्राण्यांचा उच्छाद, पिकांचे नुकसान.आज परिस्थिती अधिकच गंभीर असून, हिंसक प्राणी मानवी वस्तीत घुसून हल्ले करत आहेत. पाळीव जनावरे उचलून नेत आहेत. सायंकाळनंतर शेतात जाण्याचीही शेतकऱ्यांची हिंमत होत नाही. परिणामी रानडुक्कर, नीलगाय, हरिण व वानर पिके उद्ध्वस्त करत आहेत. अशा भीषण परिस्थितीत प्रशासन नरनाळा महोत्सव साजरा करण्यात व्यस्त आहे..हा महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याची संतप्त प्रतिक्रिया या वेळी व्यक्त करण्यात आली. सन १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मानवाच्या संरक्षणासाठी हिंसक वन्यप्राण्यांवर कारवाईचे अधिकार मुख्य वनसंरक्षकांकडे आहेत. हे अधिकार गावपातळीवर सरपंचांना देण्यात यावेत. तसेच मानवास धोका ठरणाऱ्या वन्यप्राण्यांवर तंत्रज्ञानाच्या आधारे सतत नजर ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. .या वेळी शेतकरी संघटनेचे तेल्हारा तालुकाध्यक्ष नीलेश नेमाडे, अकोट तालुकाध्यक्ष दिनेश गिर्हे, रामकिशोर थुटे, जाफर खाँ अहमद खाँ, सुरेश सोनोने, मकसूद मुल्ला, मोहन खिरोडकार, अफजल भाष्कर, नदीमोद्दिन करीमोद्दीन, गोपाल निमकर्डे आदी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.