Satara News: सातारा जिल्ह्यात फळबाग लागवडीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मनरेगाअंतर्गत शंभर टक्के अनुदानामुळे शेतकरी आंबा, पेरू, डाळिंब सीताफळ व ड्रॅगनफ्रूटसारख्या पिकांकडे वळले आहेत. जिल्ह्यात एकूण १०३५.१९ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. यातून १३४८ शेतकऱ्यांना शासकीय अनुदानचा लाभही मिळालेला आहे..जिल्ह्यात फळबागेखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्ह्याला एक हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या मध्ये १६ बहुवार्षिक फळपिकांकरिता खड्डे खोदणे, कलमे लावणे, रासायनिक व सेंद्रीय खते देणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे ही कामे शंभर टक्के अनुदानित करण्यात आली आहेत..Fruit Orchard Cultivation: राज्यात ‘रोहयो’तून ४७ हजार हेक्टरवर फळबाग लागवड.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत ३ वर्षांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत फळबाग लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. आंबा, पेरू, डाळिंब, चिकू, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, सीताफळ, अंजीर, ड्रॅगनफ्रूट आणि द्राक्षे लागवडीवर भर दिला गेला आहे. योजनेंतर्गत कमीत कमी अर्धा एकर आणि अधिकाधिक दोन हेक्टरपर्यंत प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा व इच्छुक लाभार्थींच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे..Fruit Orchard Planning: फळबागेची आखणी आणि अंतर नेमकं कसं ठरवायचं? .जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास आणि सातबारावर कुळाचे नाव असेल तर योजना राबविताना कुळाची संमती गरजेची आहे. योजनेसाठी लाभार्थी तीन जॉबकार्डधारक असावा व शेतकरी अल्पभूधारक असावा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रेाजगार हमी योजनेतंर्गत २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील ४८९४ शेतकऱ्यांनी ३४६४.५४ हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी ३४२५ लाभार्थ्यांना २४२१.५९ हेक्टर वरील बागांना तांत्रिक मान्यता दिली आहे. आतापर्यंत १३४८ लाभार्थ्यांसाठी १०३५.१९ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. उर्वरित क्षेत्रावर लागवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे..योजनेचा लाभ घ्यावामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. यामधून शेतकरी फळबागा घेऊन आर्थिक स्रोत वाढवू शकतात. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेला आहे. यापुढे माण, खटाव आणि उष्णकाळी भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.