Chandwad MVA Onion Protest: कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज मंगळवारी (दि. २६ मे) मुंबई- आग्रा महामार्गावरील नाशिकच्या चांदवड चौफुली येथे क्रांती महामोर्चा काढण्यात आला. .कांद्याच्या भावावर कायमस्वरुपी तोडगा काढावा. कांद्याला ३ हजार हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे गोंधळ उडाला. सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकले. तसेच गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. दरम्यान, पोलिसांनी काही नेते आणि आंदोलकांची धरपकड केली. .Onion Procurement Issue: नाफेडच्या कांदा खरेदीत मर्जीतील केंद्रांवर मेहेरबानी.या मोर्चात मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे उपस्थित होते..केवळ घोषणा, कांदा खरेदी कुठे सुरु आहे?; अंबादास दानवेंचा सवालसरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणार अशी घोषणा केली. पण कांदा खरेदी कुठे सुरु आहे? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सातत्याने कांदा भाव प्रश्नी आवाज उठवला. यावरून सगळीकडे आंदोलने झालेली आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि इतर ठिकाणी आंदोलने झाली. पण सरकारने फक्त घोषणा केली. पण कांदा खरेदी कुठे सुरुच झालेली नाही. नाफेडने येऊन कांदा खरेदी करावा. एक क्विंटल तरी कांदा खरेदी झाली का? असा सवाल त्यांनी केला. आधी १,२०० आणि त्यानंतर मग १,५०० रुपये जाहीर केले. पण कांदा घेतात कुठे? शेतकऱ्यांकडील कांद्याची खरेदी व्हावी. कांद्याची खरेदी केंद्रे आधी सुरु करायला हवीत. कांद्याला २ हजार रुपये भाव मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. .Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान.कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीला सरकार जबाबदार- हर्षवर्धन सपकाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. या परिस्थितीला केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तर कांद्यामुळेच हे सरकार पडेल, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. .'प्रतिक्विंटल २ ते ३ हजार फरक द्यावा'कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पण याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सरकारने जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत प्रतिक्विंटल २ ते ३ हजार फरक द्यावा, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली..कांद्याचा उत्पादन आणि मजुरीचा खर्च वाढला आहे. खते, बियाणे महागली आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव पडले आहेत. कांद्याला प्रति किलो ५० पैसे ते १ रुपये इतकी कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.