Farming Success Story: सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर (घोडेश्वर) येथील लहू आणि वैशाली या गवळी दांपत्याची एकच एकर शेती आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी मधमाशीपालनाला सुरूवात केली. अभ्यास, प्रशिक्षणातून तंत्र वापरात कुशलता मिळवत मधमाशीपालन विषयात मास्टरी तयार केली. आज मधपेट्या भाडेतत्त्वावर देणे, विक्री करणे, मधाचे उत्पादन व ब्रॅंडनिर्मिती याद्वारे आपल्या व्यवसायात त्यांनी वृद्धी केली आहे. कुटुंबाच्या आयुष्यात मधाप्रमाणे समाधानाचा गोडवा आला आहे. .सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर बेगमपूर (घोडेश्वर) (जि. सोलापूर) येथे लहू व वैशाली या गवळी दांपत्याची केवळ एक एकर शेती आहे. लहू यांच्या वडिलांचा पूर्वीपासून चप्पल निर्मिती- विक्रीचा व्यवसाय आहे. लहू यांनी बीएची पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु वडिलांच्या व्यवसायातच लक्ष घालणे पसंत केले. शेतीची आवड होतीच. त्यात वेगळे काही करायची इच्छा होती. परंतु जेमतेम एक एकरांत नेमके काय करावे या पेचात ते अडकले होते. कोल्हापूर येथे कामानिमित्त जात असताना सात-आठ वर्षांपूर्वी रस्त्याकडेला तरुण शेतकऱ्याने केलेले मधमाशीपालन पाहण्यात आले. तिथे थांबून सविस्तर माहिती घेतली. आपल्यासाठी देखील हा चांगला पर्याय असल्याचे त्यांना जाणवले. शास्त्रीय माहिती, प्रशिक्षण घेऊनच पुढे जावे लागेल हे देखील उगगले. पुणे येथील या विषयातील तज्ज्ञ डॉ. हेमंत डुंबरे यांच्याकडून ओतूर परिसरात पाच दिवसांचे शेतातील प्रशिक्षण घेतले. काहीसा आत्मविश्वास आला. तिथून खऱ्या अर्थाने व्यवसायाचा प्रवास सुरू झाला. आज सुमारे सहा वर्षे झाली. कुठेही खंड न पडता चिकाटी ठेवून गवळी दांपत्याने व्यवसायात जम बसवला आहे. स्थैर्य मिळवले आहे..Agriculture Success Story: नगदी पिकांना दिली आर्थिक शिस्तीची जोड ....असा आहे गवळी यांचा व्यवसायएपिस मेलिफेरा या युरोपीय मधमाश्यांचे पालन. व्यावसायिकदृष्ट्या ही जात पाळण्यास सोपी, तुलनेने शांत स्वभावाची आणि स्थानिक वातावरणाशी मिळतीजुळती.एक एकरांत झेंडू, गाजर, शेवगा अशी पिके. त्यात तसेच सुमारे दोन किलोमीटर परिघात वर्षभर किंवा जास्तीत जास्त काळ फुलोरा उपलब्ध असेल अशा ठिकाणी ठेवण्यात येतात मधपेट्या..वर्षभर आलटून-पालटून हीच पिके घेतात. त्यामुळे मधमाश्यांचे संवर्धन चांगल्या प्रकारे होते.मधमाशा वसाहती, फ्रेम यांची हाताळणी व एकूणच व्यवस्थापन होते शास्त्रीय पद्धतीने.संरक्षित पोशाखही परिधान केला जातो..उत्पन्नाची त्रिसूत्री१) मधपेट्या परागीभवनासाठीभाडेतत्त्वावर देण्यात येतात. होते विक्रीव्यवसायाचा मुख्य हंगाम जून ते ऑक्टोबर.सध्या १५० मधपेट्या आहेत..सोलापूरसह सांगली जिल्ह्यातील शेतकरीडाळिंब, कलिंगड किंवा अन्य पिकांतीलपरागीभवनासाठी पेट्या घेऊन जातात.प्रति पेटी दरमहा सुमारे १,५०० रुपये भाडेशुल्क..Agriculture Success Story: नगदी पिकांना दिली आर्थिक शिस्तीची जोड .२) मधपेट्यांचीमधमाशी वसाहतीसह साडेतीन हजार रुपये प्रति पेटी असा असतो दर.परागीभवनामुळे पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढते. साधारण ३० ते ४० टक्के अतिरिक्त उत्पादन या पेट्यांमुळे वाढू शकते असा शेतकऱ्यांचा अनुभव..३) मधनिर्मिती व विक्रीशंभर टक्के नैसर्गिक या लेबलने व बी किपिंग हनी या ब्रॅंडने होते मधाची विक्री.प्लॅस्टिक व काचेच्या बॉटलमधून आकर्षक पॅकिंगद्वारे ४०० रुपये प्रति किलो दराने विक्री.परिसरातील गावांमधून ग्राहक बांधावर येऊन मध घेऊन जातात.मार्केटिंग व विक्रीत लहू यांच्या पत्नी वैशाली यांची होते अधिक मदत. त्यांना सुरुवातीला मधमाशांची भीती वाटायची.मात्र त्यांनीही मधमाशीपालनाचे प्रशिक्षण पूर्ण केले. तेव्हा आत्मविश्वास वाढला. आज त्यांचा माउली स्वयंसाह्यता महिला बचत गट कार्यरत आहे. त्या माध्यमातून विविध प्रदर्शनांमधून होते मधाची विक्री. बचत गटामुळे वैशाली उमेद अभियानाशीही जोडल्या आहेत..तीनही स्रोतांमधून वर्षाला ६० ते ७० टक्के होतो नफा. त्यातून वर्षभरासाठी उत्पन्नाचा शाश्वत व खात्रीशीर स्रोत तयार केला आहे. आज दांपत्याचा मुलगा स्वप्नील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन पुण्यात नोकरी करतो आहे. मुलगी स्वप्नाली याच शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकते आहे. तेही आई-वडिलांच्या कष्टाला जमेल तशी साथ देतात..व्यवसायातील ठळक बाबीपेट्या ठेवल्यापासून किंवा नवा हंगाम सुरू झाल्यापासून सुमारे तीन महिन्यांचा कालावधी मध काढणीसाठी लागतो.पेटी शेतात ठेवल्यानंतर पहिल्या ३ ते ४ आठवड्यांत मधमाश्या नव्या वातावरणाशी जुळवून घेतात.राणी माशी अंडी घालते. नवी पिढी तयार होऊन कामकरी माश्यांची संख्या झपाट्याने वाढते..सुरुवातीला तयार होणारा मध खूप पातळ असतो. मधमाश्या आपल्या पंखांची वेगाने हालचाल करून त्यातील अतिरिक्त पाण्याचे बाष्पीभवन करतात. पाण्याचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर मध पूर्णपणे घट्ट होतो.संपूर्ण चक्राला तीन महिन्यांचा अवधी लागतो.व्यवसायात मध काढणे हा सर्वांत महत्त्वाचा आणि तितकाच कौशल्याचा टप्पा.मेणाचे आवरण काढलेल्या फ्रेम्स ‘हनी एक्सट्रॅक्टर’मध्ये ठेवल्या जातात. हे यंत्र हाताने गोल फिरवले जाते..त्यानंतर त्यातील मध अलगद बाहेर फेकला जातो. यंत्राच्या तळाशी जमा होतो.यंत्राच्या तळाशी जमा झालेला मध दुहेरी स्टेनलेस स्टीलच्या गाळणीतून गाळून घेतला जातो.त्यानंतर पूर्ण स्वच्छ मधाचे पॅकिंग होते.या प्रक्रियेत मेणाचे कसलेही नुकसान होत नाही. त्यामुळे रिकाम्या फ्रेम्स पुन्हा पेट्यांमध्ये ठेवता येतात.लहू गवळी ९४२१०२२७६७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.