Jalgaon News: खानदेशात तेलबियांची पेरणी स्थिर राहील. त्यात तीळ पेरणी यंदा कमी होईल, असे दिसत आहे. भुईमूग व तीळ पेरणी डिसेंबर व जानेवारीत होईल, असे दिसत आहे. तेलबिया पिकांत खानदेशात रब्बीत किंवा उन्हाळ हंगामात भुईमूग व सूर्यफूल अधिक असते. तीळ पेरणी कमी असते. यंदा सूर्यफूल पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी अपेक्षेएवढी झालेली नाही, अशी स्थिती आहे. पेरणी या महिन्यातही काही शेतकऱ्यांनी केली आहे. .तीळ पेरणी सतत घटतेयतीळ पेरणी पुढे सुरू होणार आहे. तर या महिन्यातही काही भागांत पेरणी केली जाईल. तीळ पिकाची पेरणी खानदेशात मागील १५ ते १८ वर्षांपासून सतत कमी झाली आहे. पूर्वी तीळ पिकाची पेरणी सात ते आठ हजार हेक्टरवर केली जात होती. जेवढी पेरणी खरिपात केली जायची, तेवढीच पेरणी रब्बीतही शेतकरी करायचे..Rabi Season: महाबीज’कडून ७५ हजार क्विंटल रब्बी बियाणे पुरवठा.तीळ पिकासाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, अमळनेर, पाचोरा, जामनेर हा भाग प्रसिद्ध होता. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नंदुरबार भागातही तीळ पेरणीला शेतकरी पसंती द्यायचे. परंतु कमी दर, अल्प उत्पादन यामुळे पेरणी कमी होत गेली. रब्बीत किवा उन्हाळ हंगामात सुमारे ४०० हेक्टरवर तीळ पीक असते. .खरिपातही पेरणी कमीचखरिपात खानदेशात सुमारे १२०० हजार हेक्टरवर तीळ पेरणी अपेक्षित होती. परंतु पेरणी ३०० हेक्टरवरच झाल्याची माहिती मिळाली. तीळाचे दर स्थिर किंवा चांगले आहेत. खरिपात उत्पादन कमी होते. कारण पावसानेही नुकसान झाले. अनेक खरेदीदार, कारखानदारांना तीळ अन्य राज्यांतून मागवावी लागते..Rabi Season: खामगाव तालुक्यात ४० हजार हेक्टरवर यंदा रब्बीचे नियोजन.तीळ दर मागील वर्षभरापासून १२ हजार रुपये प्रति क्विंटलच्या खाली आलेले नाहीत. काही बाजार समित्यांत तीळाला १३ हजार रुपये प्रति क्विंटलचा दरही मिळाला होता. जळगाव जिल्ह्यात सुमारे १५० ते २०० हेक्टरवर तीळ पीक असणार आहे. धुळे नंदुरबारमध्ये मिळून सुमारे १०० हेक्टरवर तीळ पेरणी होणार आहे..तीळाची आवक अल्प असल्याने दर टिकून आहेत. या दरांचा लाभ मिळावा व केळी, अन्य पिकांसाठी बेवड मिळावे, फेरपालट व्हावी यासाठी काही शेतकरी तीळ पेरणी करतात. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, जळगाव, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार या भागांत तीळ पेरणी होणार आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही तीळ पेरणी होईल. पेरणीसाठी अधिक गाळपक्षमता, वजनदार आणि कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड केली जाते. .बेवडसाठी पेरणी भुईमूग, तीळ पिकाची पेरणी काळ्या कसदार जमिनीत केली जाते. त्यात भुईमूग, तीळाचे उत्पादन अधिक मिळते, असेही शेतकरी मानतात. कमी खर्च व कमी पाण्यात काळ्या कसदार जमिनीत भुईमूग व तीळ पीक साध्य करणे शक्य आहे. अशा जमिनीत केळी लागवडीसाठी भुईमूग, तीळ पिकाचे बेवड असल्यास पीक जोमदार येते, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.