Hingoli News : अतिवृष्टीमुळे जवळपास ८५ टक्के क्षेत्रावरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली..जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये गुरुवारी (ता. १८) झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री झिरवाळ बोलत होते. यावेळी आमदार राजू भैय्या ऊर्फ चंद्रकांत नवघरे, आमदार संतोष बांगर, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची प्रमुख उपस्थिती होती..Flood Crop Damage : सोलापूर जिल्ह्यातील पिके भुईसपाट; घरे, वाड्या-वस्त्या, गोठ्यांमध्ये चिखल.झिरवाळ म्हणाले, की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. गोजेगाव, नुपूर, पोटा या नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्याचे पंचनामे करावेत. जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांनाही मदत उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भविष्यात पुराचा धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. .Rain Crop Damage : दिग्रस तालुक्यात संततधार पावसामुळे पिकांना फुटले कोंब .मयत झालेल्या जनावरांचेही पंचनामे करून निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच न सापडलेल्या पशूंच्या मालकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. अतिवृष्टीमुळे खराब व नादुरुस्त सर्व पुलाची व रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. .अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व बाबींच्या नुकसानीची माहिती तत्काळ उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.