Niphad Grape Farming Loss Case: निफाड तालुक्यातील सावरगाव शिवारात अज्ञात माथेफिरूंनी एका शेतकऱ्याच्या उभ्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवत ८०० ते ९०० वेली तोडून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कृत्यामुळे शेतकरी शंकर साहेबराव कुशारे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे..केवळ द्राक्षवेली नव्हे, तर शेतीची संपूर्ण यंत्रणाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फळधारणेस आलेल्या सुमारे ८०० ते ९०० द्राक्षवेली कापून टाकण्यात आल्या. तसेच शेतातील दोन बोअरवेलच्या वायरी आणि पाइप कापून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प करण्यात आला..Grape Crop Damage: द्राक्ष बागांच्या नुकसानीची मंत्री शेलार यांच्याकडून पाहणी.तसेच बोअरवेलची मोटारदेखील चोरून नेली असून, पिण्याच्या पाण्याची टाकीही फोडून टाकली आहे. बाग उद्ध्वस्त झाल्याचे पाहून कुशारे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ‘आमच्या घामाच्या थेंबावर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,’’ असा संतप्त आक्रोश शेतकरी शंकर कुशारे यांनी व्यक्त केला..Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका.पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलया प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. .मात्र घटनेला वेळ उलटूनही आरोपींचा मागमूस लागलेला नाही. या घटनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, ‘शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा केवळ कागदावरच आहे का,’ असा सवाल आता उपस्थित केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.