Nepal Tibet Border Flood: तिबेटच्या सीमेलगत नेपाळमधील भोटेकोसी नदीला आलेल्या महापुरामुळे 'रसुवा'सह तीन जिल्ह्यांत मोठा विध्वंस झाला. यात आतापर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,३०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. यात सुमारे ५०० परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तसेच या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात इमारती, रस्ते वाहून गेले आहेत. .नेपाळ पर्यटन बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, ६४४ पर्यटकांशी अद्याप संपर्क झालेला नाही. यात १७८ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि तिबेट बाजूकडील शेकडो परदेशी पर्यटक बेपत्ता आहेत. नेपाळच्या १२७, अमेरिकेच्या ६५, ऑस्ट्रेलिया ३५ आणि ब्रिटनच्या ३३ पर्यटकांचा संपर्क तुटला असल्याचे नेपाळने म्हटले आहे. .नेमका जलप्रलय कशामुळे?या आपत्तीमुळे जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी झाली. गेल्या काही वर्षांतील नेपाळमधील ही सर्वात भीषण आपत्तींपैकी एक आहे. भोटेकोशी नदीची उपनदी असलेल्या ल्हेंदे नदीत हिमस्खलन झाले. यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह थांबला. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. नदीच्या पुराचे पाणी पहिल्यांदा चीन सीमेलगत असलेल्या रसुवागढी जवळील तिमुरे येथे पोहोचले. परिणामी शेकडो लोकांची लोकवस्ती असलेला भूभाग पाण्याखाली गेला आणि त्यानंतर पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगाने खालच्या दिशेने पुढे सरकला. यामुळे हाहाकार उडाला. .Nepal Floods: नेपाळ- तिबेट सीमेवर महापुरानं हाहाकार! ३१ मृत्यू, १०५ भारतीय बेपत्ता.भोटेकोसी नदी तिबेटमधून नेपाळमध्ये वाहत येते. या नदीच्या पाण्यातून बर्फ, दगड, चिखल प्रचंड वेगाने खालच्या दिशेने वाहत आला. या आपत्तीची कोणालाही पूर्वसूचना मिळाली नाही. यामुळे मोठी जीवितहानी झाल्याचे सांगण्यात आले आहे..यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, हिमकडा कोसळणे आणि माती, दगडाच्या ढिगाऱ्यामुळे पूर आला. तसेच, नद्यांमधील या ढिगाऱ्यामुळे पुन्हा पूर येऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. .Karnataka Cloud Seeding : कर्नाटक सरकार पाडणार कृत्रिम पाऊस; ६० दिवस चालणार प्रयोग.चीनमुळे जलप्रलय? नेपाळचा आरोपदरम्यान, या आपत्तीला नेपाळने चीनला जबाबदार धरले आहे. चीनच्या बाजूला असलेल्या धरणाचा भाग कोसळल्यामुळे जलप्रलय आल्याचा नेपाळचा दावा चीनने फेटाळून लावला आहे. नेपाळमधील चिनी दूतावासाने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. चीनने नेपाळला वेळीच याची पूर्वसूचना दिली नाही, यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे..चीनकडून मोठा खुलासानेपाळमधील चीनच्या दूतावासाने फेसबुकवर जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की २६ ऑगस्ट रोजीच्या सकाळी नेपाळच्या बाजूला हिमकडा कोसळल्यामुळे ही घटना घडली. यामुळे मोठ्या प्रमाणात चिखलमिश्रित पाण्याचा प्रवाह खाली वाहून आला. परिणामी ग्यिरोंग-रसुवागढी सीमा भागातील नेपाळ आणि चीन या दोन्ही बाजूंस जीवितहानी झाली. तसेच अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. या आपत्तीवरुन आरोप करुन काहीही साध्य होणार नाही आणि सहकार्य केल्याने जीवितहानी रोखू शकतो..उत्तर भारतातील सीमा भागात अलर्टनेपाळमधील अचानक आलेल्या जलप्रलयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर भारत सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे. त्यांना बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यांत तैनात केले आहे. या दोन्ही राज्यांच्या सीमा नेपाळला लागून आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.