Amravati News: नैसर्गिक शेतीतूनच कसदार व पोषणयुक्त व आरोग्यदायी खाद्य उत्पादनांची निर्मिती होणार आहे. त्यामुळेच नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून शेतकऱ्यांमध्ये याबाबत जाणीव -जागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले. .कृषी विज्ञान केंद्र, घातखेड येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक शेती विषयावरील प्रशिक्षण वर्गात त्या बोलत होत्या. खोडके म्हणाल्या की, पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असून, या योजनेद्वारे मिळणारी थेट आर्थिक मदत ही शेती बळकट करण्यास हातभार लावते..Developed Agriculture : विकसित शेतीतूनच विकसित भारताचे निर्माण शक्य.नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या की, अधिक उत्पादकतेसाठी रासायनिक शेती पद्धतीचा वापर वाढीस लागला आहे. मात्र, हा पर्याय मानवी आरोग्यासाठी घातक ठरतो. याउलट, नैसर्गिक शेती हा आरोग्यदायी पर्याय आहे. त्यामुळे अशा पर्यायाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा..शेतीतूनच जाते आर्थिक विकासवाट .त्याकरिता कृषी विज्ञान केंद्रांनी पुढाकार घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. खोडके यांनी यावेळी केव्हीके मधील कृषी विकासासंदर्भातील विविध उपक्रमांची माहिती घेतली. आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषी विज्ञान केंद्र, घातखेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. .अतुल कळसकर यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाधारित, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक शेती पद्धती आत्मसात करण्यात या प्रशिक्षणातून मोठी मदत मिळणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.