Kolhapur News: नैसर्गिक शेतीसाठी लागणारी औषधे घरात तयार करता येतात. ती औषधे अनेक वर्षे टिकतात. यामुळे नैसर्गिक शेती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ विकास टारे यांनी केले..महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. ब्रह्मनाथ नैसर्गिक शेती गटाचे अध्यक्ष बंडेराव मगदूम, उपाध्यक्ष प्रेमचंद पाटील, सचिव रघुनाथ कुरुंदवाडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले..Natural Farming: नैसर्गिक शेती स्वीकारा: पंतप्रधान नरेंद्र मोदी.श्री. टारे म्हणाले, ‘रासायनिक खते व औषधाचे वाढलेले भरमसाठ दर तसेच कृषी औजारांचा वापर पाहता शेती व्यवसाय करणे अवघड बनले आहे. यासाठी कमी खर्चात नैसर्गिक शेती करणे फायद्याचे आहे. नैसर्गिक शेतीसाठी लागणारी औषधे कशी करायची यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती देत नैसर्गिक शेती कशाप्रकारे फायद्याची आहे हे सांगितले..Natural Farming: नैसर्गिक शेतीसमोरील वास्तविक आव्हाने.हुपरीचे मंडळ कृषी अधिकारी योगेश खाडे यांनी शेतीविषयक महाडीबीटीवर असणाऱ्या विविध योजनाची माहिती देत या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले..यावेळी उपकृषी अधिकारी राहुल कुलकर्णी, बीटीएम संदीप देसाई, सहायक कृषी अधिकारी आकांक्षा बंडगर, कृषी सखी प्रमिला कुरुंदवाडे, मयुरी लोखंडे आदी उपस्थित होते.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.