Sangli News : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष पिकांची पाहणी केली. यापाहणीमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा अहवाल संशोधन केंद्राने केला आहे. सोलापूर जिल्ह्यात संशोधन केंद्राने केलेल्या अहवालानुसार पंचनामे सुरु केले आहेत. त्यामुळे त्याच धर्तीवर जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करू लागले आहे. .जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुवर, शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ होळकर यांनी वाळवा, मिरज तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची प्राथमिक पाहणी केली. या दरम्यान, सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेत पाणी साचले होते. एक आठवडा पाऊस थांबल्यानंतरही द्राक्ष बागेत पाणी साचले होते. .Crop Damage Compensation : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शिवसैनिक आक्रमक.त्यामुळे मुळांची कार्यक्षमता मंदावली आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पाने गळून पडली आहेत. काडी परिपक्व झाली झाली नाही. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने केलेल्या अहवालात मे ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ७९७.०५ मिलिमीटर पाऊस झाला. .तर २६ सप्टेंबर एका दिवसात ११६.५८ मिलिमीटर आणि २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या दरम्यान ११९.७० मिलिमीटर पाऊस पडला. यासाऱ्यामुळे काडी पक्व होण्यास विलंब होणार आहे. यामुळे ४० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.सोलापूर विभागातही पावसाने द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने सोलापूर विभागातील बाधित झालेल्या बागांची पाहणी केली. या भागातही ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, असे अहवालात नमुद केले आहे. .Rain Crop Damage : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीने ४२०४ हेक्टरची हानी.त्यामुळे द्राक्ष बागांचे पंचनामे संबंधित विभागाने सुरु केले असल्याचे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती ती चव्हाण यांनी सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने बाधित झालेल्या द्राक्ष पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत. मग सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकांचे पंचनामे का सुरु केले नाहीत, असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकरी करू लागला आहे. संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक करू लागला आहे..पंचनामे करण्याबाबत बैठकराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने तयार केलेला अहवाल संबंधित विभागाकडे पोहोचला आहे. त्यामुळे द्राक्ष पिकाचे पंचनामे करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत कृषी विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पंचनाम्याचा निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.द्राक्ष पिकाचे नुकसान भरून निघणारे नाही. त्यामुळे राज्य सरकारने द्राक्षसह फळ आणि इतर पिकांचे तातडीने पंचमाने करावे, दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. द्राक्ष पिकाचे पंचनामे करून भरपाई मिळाली नाही तर आंदोलन करू.- मारुती चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.