Nagpur News: अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील ६२ शेतकऱ्यांकडून रक्कम घेतल्यानंतरही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कृषी वीजजोडणी दिली नाही. ही बाब प्रथमदर्शनी संविधानाच्या कलम २१ (जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) भंग आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. .या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, धारणी तालुक्यातील ६२ शेतकऱ्यांनी वारंवार विनंत्या करून, अर्ज देऊन आणि काही रक्कम जमा करूनही महावितरण विभागाने कृषी उद्देशासाठी वीजजोडणी देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही..Agriculture Electricity Connection: शेतीला दिवसा वीज कधी?.या महावितरण विभागाच्या कृतीवर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. शेती उपक्रमांसाठी वीज ही जीवनवाहिनीच आहे. त्यामुळे महावितरण कंपनी शेतकऱ्यांना विजेपासून कशी वंचित ठेवू शकते, असा प्रश्न न्यायालयाने केला..Agriculture Electricity: वन्यप्राण्यांची भीती; दिवसा वीजपुरवठ्याची मागणी.तसेच न्यायालयाने हे प्रकरण व्यापक जनहित असल्याचे नमूद करीत त्याला जनहित याचिकेमध्ये रूपांतरित केले. या प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करता न्यायालयाने ॲड. रोहन देव यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली..तसेच त्यांना जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. एस. आय. घट्टे यांनी ॲड. रोहन देव यांना प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. न्यायालयाने महावितरणसह इतर सर्व प्रतिवादींना नोटीस बजावत ९ जानेवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.