Raigad News: श्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाल्याने हापूस आंबा कलमांवर मोहोर येण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सकाळ-संध्याकाळ जाणवणारी थंडी आणि कोरडे हवामान यामुळे बहुतांश भागात आंब्याच्या कलमांवर मोहोर बहारू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण असून यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी आशा पल्लवित झाली आहे..यावर्षी सुरुवातीला काही भागांत ढगाळ हवामान आणि तुरळक अवकाळीमुळे आंबा कलमांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर आलेल्या थंड व कोरड्या हवामानामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. .Mango Flowering: विक्रमगड तालुक्यात आंबा पीक मोहरले .कमी आर्द्रता आणि थंड वारे यामुळे मोहोर धरायला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, कार्ले,.Mango Flowering: सातपुड्यातील आंबा बागा मोहरल्या.नागलोली तसेच वडवली, वेळास आणि दिघी परिसरातील अनेक बागांमध्ये हापूस आंब्याच्या कलमांवर मोहोर स्पष्टपणे दिसू लागली आहे..https://youtu.be/0B_xQcg_L78?si=W8fdZgJTgXk7294Eमोहोर फुटल्यानंतर तुडतुडा, थ्रिप्स तसेच इतर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बागायतदारांनी प्रतिबंधात्मक औषध फवारणीला सुरुवात केली आहे. खर्चात वाढ होत असली तरी अत्यावश्यक असल्याचे बागायतदार सांगत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.