India Mango Season: गुढीपाडवा व अक्षय तृतीया या सणांपासून खऱ्या अर्थाने आंबा हंगाम बहरतो. मात्र यंदा लांबलेला मॉन्सून, ऑक्टोबरमधील अवकाळी पाऊस, थंडीचा कमी कालावधी आणि वाढलेले तापमान अशा संकटात कोकणातील आंबा सापडला. उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. परिणामी, पुणे बाजारात आंब्याची आवक लक्षणीय घटून दर तेजीत आहेत. बागायतदार महोत्सवाच्या माध्यमातून बाजारपेठ मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. अक्षय तृतीयेच्या अनुषंगाने घेतलेला आढावा. .पुणे बाजार समितीमध्ये साधारण जानेवारी महिन्यात आगाप हंगामाच्या आंब्याची आवक सुरू होते. तर गुढीपाडव्याला हंगाम सुरळीत होतो. यंदा हवामान बदलांच्या विपरीत परिणामांमुळे ग्राहकांना पुरेसा आंबा चाखता आला नाही. अक्षय तृतीयेला आंबा मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र बाजारात मोठी टंचाई निर्माण झाल्याने आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. यंदाच्या हंगामाबाबत पुणे बाजार समितीमधील कोकण हापूस आंब्याचे प्रमुख अडतदार करण जाधव यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की हंगामापूर्वी आम्ही नियमितपणे कोकणातील आंंबा उत्पादकांच्या भेटीसाठी जात असतो. फेब्रुवारी- मार्चमधील भेटीत आंब्याचा मोहर काळा पडलेला जाणवला. यंदा केवळ २० ते २५ टक्केच उत्पादन हाती लागण्याचा अंदाज शेतकऱ्यांचा होता. तो खरा ठरत आहे..Mango Fruit Drop Issue: तापमानवाढीमुळे आंबा फळगळ वाढली.गुढीपाडव्याला पुणे बाजार समितीत कोकणातून आंब्याची मोठी म्हणजे दीड हजार ते दोन हजार पेटी प्रति दिन असते. यंदा ती अवघी ७०० ते ८०० पेटी राहिली. दर अक्षय तृतीयेला १५ ते २० हजार पेट्यांची होणारी आवक यंदा १० हजार पेट्यांपर्यंत मर्यादित राहील असा अंदाज आहे. त्यामुळे बाजारात पिकलेला आंबा तुलनेने कमी उपलब्ध असेल..तापमानाचा मोठा फटकापुणे बाजारात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आठ दिवस आधी आंब्याची आवक वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती ५० टक्केच आहे. सध्या दररोज ५ ते ६ हजार पेटी कच्चा पेटीची आवक होत असून ४ ते ६ डझनांच्या पेटीला २ ते ३ हजार रुपये, तर ५ -६-७ डझनांच्या पेटीला ३ ते ५ हजार रुपये दर आहेत. हेच दर तयार आंब्याला प्रति ४ ते ६ डझनांसाठी ५ ते ६ हजार, तर ६-७- ८ डझनांसाठी ५ ते ८ हजार रुपये आहेत. प्रति डझनाला एक हजार ते दीड हजार रुपये दर आहेत. हेच दर मागील वर्षी अक्षय तृतीयेला ५०० ते ८०० रुपये होते. अक्षय तृतीयेला आंबा कमी उपलब्ध झाल्यास मे महिन्यात दुसऱ्या बहराचा आंबा उपलब्ध होतो..मात्र यंदा वांझ मोहर राहिल्याने फळधारणा झाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागील आठवड्यापासून राज्यात तापमानात तीव्र वाढ झाल्याने दुसऱ्या मोहरातील फळांची गळ झाली. त्यामुळे मेमध्ये आंबा कमीच राहणार असल्याचे बागायतदार गणेश देसाई (रा. माजरे ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) यांनी सांगितले. त्यामुळेच शहरातील अनेक विक्रेत्यांनी अक्षय तृतीयेसाठी पिकलेला आंबा ग्राहकांना उपलब्ध करण्यासाठी ८-१० दिवस आधीच खरेदी केली. तो पिकवणगृहात ठेवला. मात्र बाजार समितीत तयार आंबा फारसा उपलब्ध नसेल अशी परिस्थिती आहे..विक्री पद्धत बदलतेय, कर्नाटक आंब्यावर भिस्तदहा वर्षांपूर्वी ग्राहक ४-५ डझनांची आंबा पेटी मोठ्या उत्साहात ऐटीत खरेदी करायचे. मात्र हवामान बदलामुळे आवकेवर परिणाम झाल्याने दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी पेटी घेणे परवडत नाही. त्यामुळे बाजार समितीत १-२ आणि तीन डझनांच्या कोरूगेडेट बॉक्समध्ये आंबा उपलब्ध होत आहे. त्याचे दर एक हजार ते दीड हजार रुपये आहेत. कोकणातील आंब्याचे दर तेजीत असल्याने काही ग्राहक कर्नाटक आंब्याकडे वळाले असल्याचे या आंब्याचे प्रमुख व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले. सध्या बाजारात कर्नाटकातील विविध वाणांच्या आंब्याची अडीच हजार ते तीन हजार पेटी आणि बॉक्स आवक आहे. यात हापूस, पायरी, बदाम, लालबाग आदींचा समावेश आहे. कोकण हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्याने कर्नाटकच्या आंब्याला ग्रामीण भागातून मागणी वाढत असल्याचे उरसळ यांनी सांगितले..Hapus Mango Adulteration: हापूसमधील भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना करा : राजू शेट्टी.पणन मंडळाच्या महोत्सवात कोटींची उलाढालमहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवाला यंदा १० एप्रिल रोजी प्रारंभ झाला. कोकणातील १०० हून अधिक शेतकरी सहभागी झाले. पंधरा दिवसांत चार हजार डझन आंब्याची विक्री झाली. सरासरी एक हजार रुपये प्रति डझन दर मिळाला. पुढील दोन दिवसांत अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विक्री वाढून एक कोटींंच्या उलाढालीचा अंदाज असल्याचे पणन मंडळाचे आंबा महोत्सवाचे व्यवस्थापक सुहास काळे म्हणाले. पणन मंडळ २५ वर्षांपासून महोत्सवाचे आयोजन करीत असून, या संपूर्ण काळात सव्वादोनशे कोटींपर्यंत उलाढाल झाल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी सांगितले..कर्नाटकातील आंब्याचे दर (रुपये)कर्नाटकातील आंब्याचे दर (रुपये)हापूस ३ ते ५ डझन १८००-२३००दोन डझन बॉक्स ८००-११००सुटा १४० ते १८० रु. प्रति किलोप्रति किलो पायरी ७०-१००बदाम ६०-८०लालबाग ६० ते ८०.सन २००४ पासून पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात सहभागी होतो. आमची ५०० झाडे असून हापूस, केसर आणि पायरी अशी विविधता आहे. यंदा हंगामाची सुरुवात चांगली होती. मात्र धुके, दमट हवामान, थंडीचा कमी कालावधी यांचा परिणाम झाला, फळधारणा न झाल्याने २५ ते ३० टक्केच उत्पादन हाती आहे. महोत्सवात नियमित ग्राहक असल्याने अन्य बाजारांपेक्षा प्रति डझनाला १०० ते १५० रुपये येथे जास्त मिळतात. एकूण उत्पादनाच्या ५० टक्के आंबा मुंबई वाशी येथे बाजार समितीत ,तर ५० टक्के पुण्यात महोत्सवात विक्री करतो.गणेश देसाई ९५५२८५३४२१ माजरे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी.आमची २५० झाडे असून, दरवर्षी ३०० पेटी महोत्सवात विक्री करतो. या वर्षी उत्पादन कमी असल्याने महोत्सवात एका स्टॉलमध्ये दोन शेतकरी अशी व्यवस्था केली आहे. यंदा केवळ पाच डझनांच्या १०० पेट्या विक्रीसाठी आणल्या आहेत. प्रति डझनाला १४००-१५०० दर मिळत आहे.विकास यशवंत करंदीकर ९३७०७६२५६८ पुरळ हुर्शी ता. देवगड, जि. सिंधुदुर्गडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.