Thane News: पूर्वी घोडबंदर रोड परिसरामधील गावांमध्ये आंब्याच्या बागा (आमराई) होत्या. त्या बागाच आता राहिल्या नाहीत. त्यामुळे आमराईतील आंब्याचा गोडवा नव्या पिढीला अनुभवता यावा, यासाठी ठाणे महापालिका काही ठिकाणी आमराई फुलविण्यासाठी कामाला लागली आहे. महापालिकेच्या शहर विकास विभागामार्फत किमान पाच एकर असलेल्या मोकळ्या जागांच्या शोधात आहे. त्यामुळे लवकरच ठाण्यात आमराई निर्माण केली जाईल अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. .काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ठाणेकर असलेले आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ओक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील आंबा आणि त्याच्या चवीचा गोडवा सांगताना, तो पुन्हा चाखता यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती..Mango Orchard Management : अतिघन आंबा बागेतील व्यवस्थापन.ती बाब उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मनावर घेत, ठाण्याच्या मातीतील आंब्याचा गोडवा सर्वांना अनुभवता यावा आणि जुने आमराईचे वैभव निर्माण करता येईल का, असा प्रस्ताव तत्काळ ठाणे महापालिका प्रशासनासमोर मांडला. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने संबंधित विभागाला उपमुख्यमंत्री शिंदे यांची संकल्पना सांगून कामाचेचे आदेश दिले..उद्यान विभागाने सुरुवातीला मुल्लाबाग येथे आमराई फुलविण्याचा निर्णय घेतला; पण तेथे असलेल्या मोठ्या वृक्षवल्लींमुळे तेथे अशक्य वाटू लागले. याचदरम्यान पालिकेने किमान पाच एकर जागांचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार जागा शोधमोहीम हाती घेतली गेली आहे. साधारणपणे सहा ते सात ठिकाणी पहिल्या टप्प्यात आमराई तयार केली जाणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या मातीतील आंब्याचा गोडवा अनुभवता येईल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे..Mango Orchard Management : अतिघन आंबा बागेत करावयाची कामे.कृषी विद्यापीठाची मदत घेणारआमराई तयार करण्यासाठी लागणाऱ्या आंब्याच्या प्रजाती या कोकणातील दापोली येथील कृषी विद्यापीठातून आणण्यात येणार आहेत. साधारणपणे सात ते आठ प्रजातींच्या आंब्याची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे ठाण्याला लवकरच एक नवीन ओळख मिळेल आणि पुन्हा एकदा जुने वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे..ठाणे शहरात आमराई फुलविण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना आहे. त्यानुसार पालिकेचा उद्यान विभाग आणि शहर विकास विभाग कामाला लागले आहे. जागा निश्चित झाल्यावर येत्या काही दिवसांत आंब्याच्या विविध प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने सात ते आठ प्रजातींच्या आंब्याचा गोडवा अनुभवता येईल. येत्या महिन्याभरात किंवा पंधरा दिवसांत खऱ्या अर्थाने प्रक्रिया सुरू होईल. - मधुकर बोडके, उपायुक्त, उद्यान विभाग, ठाणे महापालिका.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.