Weather Impact: पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांत वाढलेल्या उष्णतेमुळे, तापमानामुळे आणि हवामान बदलाचा आंबापिकाला मोठा फटका बसला आहे. प्रचंड उष्णतेमुळे झाडावरील वाटाणा आकाराची लहान फळे, लहान कैऱ्या करपून गळण्याचे प्रमाण वाढले आहे..हवामान बदलामुळे आंब्याच्या बागांची फलधारणा कमी झाली असून, बागायतदार संकटात सापडले आहेत. हवामानात सातत्याने होणारा बदल, तर दुसरीकडे वाढती उष्णता यामुळे यंदाही पालघर जिल्ह्यात आंब्याच्या उत्पादनावर नक्कीच परिणाम होणार असल्याचे गेली २५ वर्षे आंबा उत्पादन घेणारे तलासरी तालुक्यातील बोरीगाव येथील आंबा उत्पादक शेतकरी यज्ञेश सावे यांनी सांगितले आहे..Heatwave Impact: उष्णतेच्या दाहला योजनेचा मुलामा.डिसेंबर-जानेवारीमध्ये थंडीचे प्रमाण समाधानकारक होते. त्यामुळे आंबा बागांमध्ये मोहोर चांगला आला होता. फळधारणाही उत्तमप्रकारे होत असताना दिसत होती; मात्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानात झालेल्या झपाट्याच्या वाढीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली..Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल.उष्णतेचा थेट परिणाम नव्याने लागलेल्या फळांवर झाला आहे. परिणामी, यंदाच्या हंगामातील उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..जिल्ह्यात आंबापिकामध्ये फळधारणा झालेली असून फळगळ दिसून येत आहे. सद्यःस्थितीमध्ये ढगाळ वातावरण राहून पाऊस पडल्यास तापमान तसेच आर्द्रतेमध्ये बदल होऊन आंबा फळांचे गळ व आंबापिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.- डॉ. अंकुर ढाणे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, पालघर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.