Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या थंडीमुळे आंबा, काजूला पोषक वातावरण निर्माण झाले असल्यामुळे चांगला मोहर आला आहे. यामुळे बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे..जिल्ह्यात या वर्षी सुरुवातीला १४ ते १७ नोव्हेंबरपर्यंत कडाक्यांची थंडी होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत कमालीचा गारठा आहे. गेले आठ दिवस तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे..Mango Crop Pest: आंब्यावरील ‘लीफ मायनर’.या वर्षी प्रथमच ९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. सलग दहा-बारा दिवस थंडी राहिल्यामुळे आंबा, काजू पिकांसाठी पोषक वातावरण आहे. ज्या आंबा, काजूच्या झाडांना पालवी, मोहर आला नव्हता अशा झाडांना चांगला मोहर फुटू लागला आहे..Kaju Farming: अंतिम टप्प्यातील काजू संकलन, प्रतवारीवर भर.थंडीचा चांगला परिणाम पिकांवर दिसू लागला आहे. थंडीमुळे जिल्ह्यातील पिकांवर कीड-रोगांचे प्रमाणदेखील अल्प आहे..यंदा अतिपावसामुळे आंबा, काजू बागायतदारांमध्ये या वर्षीच्या हंगामाबाबत संभ्रमावस्थेचे वातावरण होते. परंतु थंडीमुळे आंबा, काजूला आलेल्या चांगल्या मोहराने सर्व चित्र बदलले आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील आंब्याला लहान फळे आणि काजूला देखील काही ठिकाणी फळधारणा झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.