Karad News: शेतकऱ्यांकडील सर्व पशुधनाला सरकारने इअर टॅग लावणे आणि त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीअंतर्गत करणे बंधनकारक केले आहे. मात्र, शेतकऱ्यांना हे लवकर शक्य होणार नाही. सरकारने थेट बंधनच घातल्याने पशुसंवर्धन विभागाकडे एवढे इअर टॅग उपलब्ध असतील का? हा प्रश्न पेरणीवर आला आहे. दरम्यान, वेळेत इअर टॅग न मिळाल्याने शेतकरी, व्यापारी आणि बाजार समित्यांतील जनावरांच्या बाजारात जनावरांची संख्या कमी होऊन मोठी आर्थिक कोंडी होणार आहे..जनावरांची ओळख पटवणे, आरोग्य ट्रेकिंग करणे आणि खरेदी-विक्री सुलभ करण्यासाठी इअर टॅग बंधनकारक करण्यात आले असून, जनावरांना १२ अंकी युनिक आयडी दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांची वंशावळ आणि लसीकरणाची माहिती ठेवणे सोपे होणार आहे. त्याचा विचार करून इअर टॅग नसलेल्या पशुधनाची खरेदी- विक्री, वाहतूक, तसेच पशुवैद्यकीय सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यांतर्गत व राज्याबाहेरील वाहतुकीसाठीही इअर टॅग आणि ऑनलाइन नोंद अनिवार्य आहे. मात्र, अचानक शेतकऱ्यांना इअर टॅग जनावरांना लावणे शक्य होणार नाही, अशी सद्यःस्थिती आहे. त्यातच टॅग पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, की नाही याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. इअर टॅग नसल्याने त्याचा परिणाम बाजारातील जनावरांच्या उलाढालीवर होणार असून, आठवडी बाजार, जनावरांच्या बाजार समित्या आणि गावपातळीवरील व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे..Ear Tag Shortage: पशुधन बाजारात भासतेय ‘इअर टॅग’ची चणचण.इअर टॅग असल्याशिवाय जनावरांची विक्री होत नसल्याने आर्थिक अडचणी वाढत आहेत, तर दुसरीकडे इअर टॅग वेळेत न मिळाल्यानेही नुकसानभरपाई, विमा व अन्य शासकीय लाभावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी कोंडीत अडकले आहेत. नैसर्गिक आपत्ती, आजार किंवा अपघातात मृत्यू झालेल्या पशुधनाबाबतही टॅग नसल्यास भरपाई मिळत नाही. या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांनी शासनाकडे तातडीने सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत पुरेसे इअर टॅग उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत कारवाई स्थगित ठेवावी, बाजार समित्या किंवा अधिकृत यंत्रणांच्या माध्यमातून टॅग उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे..नकली टॅगची भीतीपशुधन नोंदणी, रोगनियंत्रण आणि पारदर्शकतेसाठी इअर टॅगिंग महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने टॅग उपलब्ध करून दिले जात नसल्याने बाजारात नकली टॅग उपलब्ध केले जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. त्यावर पशुसंवर्धन विभागाने लक्ष ठेवण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांना फसवणुकीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..Cattle Ear Tagging: ईअर टॅगिंग नसल्यास जनावरांची खरेदी-विक्री नाही; श्रीकृष्ण घुमरे.पशुधनासाठी टॅग बंधनकारक करण्यात आल्याने बाजार समितीमधील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक शेतकरी विना टॅग जनावरे विक्रीसाठी आणतात. मात्र, टॅग नसल्याने त्यांचे व्यवहार होत नाहीत. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने एक अधिकारी जनावरांच्या बाजारस्थळी उपलब्ध करून द्यावा.- संजय शिंदे, शेतकरी.जिल्ह्यातील सर्व जनावरांची संख्यातालुका जनावरांची संख्या(सुमारे)महाबळेश्वर १५ हजार ५७६वाई ५९ हजार ३७०खंडाळा ८३ हजार ५५१फलटण दोन लाख ४८ हजार तीन.माण दोन लाख २९ हजार ९१खटाव एक लाख ५१ हजार ३०कोरेगाव ९० हजार २२९सातारा ८२ हजार ५४५जावळी २४ हजार ३८पाटण एक लाख १४६कऱ्हाड एक लाख ४७ हजार ६८५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.