Water Supply Crisis: मंचर (ता. आंबेगाव) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुलतानपूर येथील घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात येत असून, केवळ १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. यामुळे शहरावर पाणीसंकट ओढवण्याची शक्यता असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे..पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष संदीप थोरात, नगरसेवक वसंतराव बाणखेले, शिवाजीराव राजगुरू, विकास जाधव, मालती थोरात, वंदना बाणखेले, विशाल आवळे आणि अधिकारी राजश्री मोरे यांनी सुलतानपूर येथील विहीर व बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली..Khandesh Water Storage: खानदेशातील जलसाठा २८ टक्क्यांखाली.यावेळी पाणीसाठा अत्यंत कमी असल्याचे समोर आले. डिंभे धरणातून तातडीने पाणी सोडावे आणि बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मण थोरात यांनी दिली..Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी.दृष्टिक्षेपात सुलतानपूर बंधाऱ्यात १५ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक. दररोज ३५ लाख लिटर पाणीपुरवठा. १५० अश्वशक्तीच्या दोन विद्युत मोटारी. शहरातील ५ हजार ५५० घरगुती व व्यावसायिक नळजोडण्या. अधिकृत लोकसंख्या ४५ हजार, प्रत्यक्षात ५० हजारांहून अधिक. शहरात ५५ किलोमीटर लांबीची जलवाहिनी व्यवस्था..नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. अनावश्यक अपव्यय टाळून पाणी वाचविण्यासाठी नगरपंचायतीला सहकार्य करावे.लक्ष्मण थोरात-भक्ते, उपनगराध्यक्ष, मंचर नगरपंचायत.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.